
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आली आहे. आज सायंकाळीयांचा मुंबईला पाणीपुरवठा करणारे धरणांपैकी एक तानसा हे धरण चार वाजून पंधरा मिनिटांनी दोन दरवाजे ओपन होऊन तुडुंब भरून वाहू लागले आहे.

बृहनमुंबई महानगरपालिकेच्या या धरणाची ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मी.टीएचडी इतकी आहे. तानसा धरण परिसरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.

धरण जवळपास भरलं आहे. त्यामुळे तानसा धरणा लगतच्या आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना दक्ष राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

जून आणि जुलैच्या सुरुवातीपर्यंत पावसाने दडी मारल्याने यंदा धरणं भरणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत होता. कारण धरणांनी तळ गाठला होता. तुळशी पाठोपाठ तानसा धरणही भरुन वाहू लागली आहे.

तानसा धरणाची कमाल क्षमता १४,५०८ कोटी लीटर एवढी आहे. गेल्या वर्षी धरण २६ जुलै रोजी पहाटे ४.३५ वाजता धरण भरलं होतं. तर २०२२ मध्ये १४ जुलै रोजी रात्री ८.५० वाजता भरले होते.