AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Heavy rain: मुंबई, पुण्यात 24 तासांत विक्रमी पाऊस, पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज

Mumbai Records 200mm Rainfall: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात पाऊस पडत आहे. अजून पुढचे दोन दिवस महाराष्ट्रासह कोकणात पाऊस पडणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा आँरेज अलर्ट दिला आहे.

Heavy rain: मुंबई, पुण्यात 24 तासांत विक्रमी पाऊस, पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज
rain
| Updated on: Sep 26, 2024 | 11:51 AM
Share

Mumbai Records 200mm Rainfall: महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत विक्रमी पाऊस झाला आहे. मुंबई अन् पुण्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत पाच तासांतच 200 मिमी पाऊस झाला आहे. पुण्यातही 125 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मुंबई आणि ठाण्यात आज देखील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अजूनही मुंबईत कमी वेळेत अधिक पावसाची शक्यता आहे. मात्र बुधवारपेक्षा त्याची तीव्रता कमी असणार आहे.

मुंबईत 250 मिमी पाऊस

मागील 24 तासांत मुंबईतील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. मुंबईतील काही ठिकाणी 250 मिमीहून अधिक पाऊस झाला आहे. पालघरमध्ये गुरुवारी काही भागात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. एक दोन ठिकाणी 200 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार आहे.

पुण्यात पुन्हा ऑरेंज अलर्ट

पुण्यासाठी आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नाशिकसाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे.

का सुरु आहे पाऊस

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात पाऊस पडत आहे. अजून पुढचे दोन दिवस महाराष्ट्रासह कोकणात पाऊस पडणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा आँरेज अलर्ट दिला आहे. शुक्रवारनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. तळकोकणापासून रत्नागिरी जिल्ह्यापर्यत सर्वत्र पाऊस सुरु आहे. बुधवारी रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी पडत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आजपर्यत 104 टक्के पाऊस झाला आहे. एकूण 3488 मिलिमिटर पावसाची आतापर्यत नोंद झाली आहे.

उजनी धरणातून विसर्ग

उजनी धरणाच्या वरील साखळीमधील सर्व धरणे काठोकाठ भरली आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. भीमा नदी पात्रात दौंड बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक देखील होते आहे. यामुळे उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 31 हजार 600 क्यसेक इतक्या दाबाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. उजनी धरणाचे 16 दरवाजे दोन फुटाने उचलण्यात आले आहेत. सध्या उजनी धरण 109 टक्के क्षमतेने भरले आहे. उजनीत 122 टीएमसी इतका पाणी साठा आहे.

Follow Us
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप.
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची....
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची.....
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल.
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर....
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर.....
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या...
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या....
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.