AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनामुळे बंद असलेली मेमू आजपासून पुन्हा सुरु, चाकरमान्यांना दिलासा, एका क्लिकवर वेळापत्रक पाहा

अनेक महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असलेली वसई रोड, दिवा, पनवेल ही मेमू आजपासून पुन्हा सुरळीत सुरु झाली आहे. मध्य, पश्चिम, हार्बर लाईनला जोडणारी ही मेमू चालू झाल्याने चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनामुळे बंद असलेली मेमू आजपासून पुन्हा सुरु, चाकरमान्यांना दिलासा, एका क्लिकवर वेळापत्रक पाहा
मेमू ट्रेन
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Sep 24, 2021 | 11:08 AM
Share

मुंबई : अनेक महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असलेली वसई रोड, दिवा, पनवेल ही मेमू आजपासून पुन्हा सुरळीत सुरु झाली आहे. मध्य, पश्चिम, हार्बर लाईनला जोडणारी ही मेमू चालू झाल्याने चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोणत्या गाडीच्या किती फेऱ्या?

मध्यरेल्वेच्या प्रस्तावानुसार दिवा-वसई रोड मेमू गाडीच्या दररोज आठ फेऱ्या होणार आहेत. वसई रोड-पनवेल मेमू गाडीच्या रोज 6 फेऱ्या होणार आहेत. तर पनवेल दिवा-वसई रोड मेमूच्या शनिवार व रविवार वगळता दररोज 8 फेऱ्या होणार आहेत.

अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना दररोज तिकीट, लसीचे दोन डोस घेतलेल्यांना मासिक पास

कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रवाशांना प्रवास करावा लागणार आहे. अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना दररोज तिकीट मिळणार आहे तर दोन डोस घेतलेल्यांना मासिक पास मिळणार आहे.

मेमो सुरु झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण

ही मेमू चालू झाल्याने प्रवाशांना समाधान मिळाले असून त्यांनीही रेल्वे प्रशासनाने आभार मानले आहेत. पण याच मेमूच्या वेळापत्रकामध्ये बदल करून ऑफिस वेळेनुसार सुरू केली तर आणखी बरे होईल अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

मेमूचे वेळापत्रक

दिवा वसई रोड- सकाळी 5.49 वाजता , 11.30, दुपारी 2.33, सायंकाळी 4.25, 5.55

वसई रोड दिवा- सकाळी 9.50, दुपारी 12.55, दुपारी 3.55, सायंकाळी 5.35, सायंकाळी 7.15

पनवेल दिवा- सकाळी 8.25, 10.30, दुपारी 12.10

दिवा पनवेल- सकाळी 9.25, सकाळी 11.20, सायंकाळी 6.45

लोकल सुरू, पण बस स्टॉपवरील गर्दी कायम

राज्य सरकारने मुंबईची लोकल सेवा 15 ऑगस्टपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केली आहे. मात्र, तरीही लोकलपेक्षा बसलाच अधिक गर्दी होताना दिसत आहे. अनेक बस स्टॉपवर चाकरमान्यांची प्रचंड गर्दी कायम असल्याचं चित्रं आहे. केवळ दोन डोस घेतलेल्यांनाच लोकलमधून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. शिवाय पासची प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे बस स्टॉपवर गर्दी होत असल्याचं सांगितलं जात आहे.

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा राज्यसरकारने दिलेली आहे. परंतु, तरी देखील लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही. कारण मुंबईमध्ये लसीकरणाचे दोन डोस पूर्ण केलेल्या लोकांच्या संख्येपेक्षा एक डोस घेतलेल्या लोकांची संख्या ही जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना लोकल प्रवास करता येत नाही. म्हणून हे सर्व सामान्य प्रवासी आजही बसने प्रवास करत आहेत. त्याचमुळे मुंबईमधील ठिकाणी बस स्टॉपवर लोकांची मोठी रांग दिसून येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यासंदर्भात सामान्य मुंबईकरांनी प्रशासनाच्या विरोधात आपला रोष सुद्धा व्यक्त केलेला आहे.

हे ही वाचा :

मुंबईकरांना लोकल प्रवासाची मुभा, पण ट्रेनला पहिल्यासारखी गर्दी नाही, कारण…

कोरोना लसीकरणात महाराष्ट्राची घोडदौड सुरुच, आतापर्यंत 5 कोटी डोस दिले

Follow Us
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?