कोर्टाने कपडे काढले, आता फक्त एक्सरे बाकी, जितेंद्र आव्हाड असे का म्हणालेत?

आमची जशी वज्रमूठ एक होती तशीच राहील. महाविकास आघाडी एकत्र आहेत. आम्हाला भीती नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

कोर्टाने कपडे काढले, आता फक्त एक्सरे बाकी, जितेंद्र आव्हाड असे का म्हणालेत?
Govinda Hatwar | Updated on: May 12, 2023 | 3:33 PM

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने काल सत्ता संघर्षावरील निकाल दिला. जो तो आपआपल्या पद्धतीने या निकालाचे विश्लेषण करत आहे. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. जितेंद्र आव्हाड म्हणाले, सुप्रीम कोर्टाने सर्व कपडे काढून टाकलेत. आता फक्त एक्सरे करणे बाकी राहिले आहे. किती दिवसात पोपट मेल्याचे जाहीर करायचे, एवढं बाकी राहिले आहे. हा निकाल आमच्या बाजूने हे त्यांना सांगावे लागत आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

जास्तीत जास्त ते काय करतील?

जितेंद्र आव्हाड म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्पष्ट आहे. सुप्रीम कोर्टाने जे सांगितले ते देखील स्पष्ट आहे. पोलीस अधिकाऱ्यांना नोकरासारखे वागवतात. जास्तीत जास्त केसेस टाकतील. दुसरे ते काही करु शकत नाही. तुरुंगात टाकतील ते त्यापेक्षा जास्त काय करतील.

महाविकास आघाडी एकत्र आहे

सरकार काय करू शकते. फक्त खोट्या केसेस करू शकते. त्या व्यतिरिक्त सरकार काय करू शकते. चार दिवस सरकार जेलमध्ये टाकू शकते. त्याव्यतिरिक्त काय होऊ शकते, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. आमची जशी वज्रमूठ एक होती तशीच राहील. महाविकास आघाडी एकत्र आहेत. आम्हाला भीती नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांनी सत्तेला लाथ मारली

राज्यातील जनतेला सांगायचे आहे की सत्ता कुणी सोडत नाही. सत्तेसारखा नाद कुठलाच नाही. सत्तेतून बाहेर पडणे याला नैतिक बळ लागते. आजही मला उद्धव ठाकरे यांचे कौतुक वाटते की त्यांनी सत्तेला लाथ मारली.

पानावर दिलेले वाचायचे असते

राज्यपालांना सुप्रीम कोर्टाने जे रुल बुक दिले आहे त्यानुसार काम करावं लागतं. पानावर लिहिलेलं वाचायचं असते आणि कारवाई करायची असते. त्या माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे कपडे कोर्टाने फाडले. त्या नालायक माणसाला तिकडे बसवलं होते, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

याला नैतिकता म्हणायची काय?

कुठलेही सरकार निवडून आले तर दोन चार कोटी रुपये देऊन पाडून टाकायचे. याला नैतिकता म्हणायची काय, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला. काल सकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे 200 च्या स्पीडने बॉलिंग करत होते. आज 10 च्या स्पीडने बोलले. ते थकलेलं वाटले, असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us