AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अध्यक्षांना पत्र लिहिणे म्हणजे दबाव नव्हे, अनिल परब यांनी सुनावले

पत्र लिहिणे म्हणजे दबाव नव्हे. अध्यक्ष काहीतरी चुकीचे करतात असं वाटत असेल, तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात न्याय मागू, असा इशाराही अनिल परब यांनी दिला.

अध्यक्षांना पत्र लिहिणे म्हणजे दबाव नव्हे, अनिल परब यांनी सुनावले
Anil Parab
| Updated on: May 12, 2023 | 3:02 PM
Share

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. स्वतंत्र न्याय प्रक्रियेला बाधा आणण्याचा प्रयत्न केला जातो, असंही ते म्हणाले. यावर प्रतिक्रिया देताना अनिल परब म्हणाले, विधानसभा अध्यक्षांवर दबाव कुणीही आणू शकत नाही. परंतु, अध्यक्षांना पत्र लिहिण्याचे काम आम्हाला करावेच लागेल. त्याच्यात काय दबाव आहे, असा सवाल परब यांनी विचारला. पत्र लिहिणे म्हणजे दबाव नव्हे. अध्यक्ष काहीतरी चुकीचे करतात असं वाटत असेल, तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात न्याय मागू, असा इशाराही अनिल परब यांनी दिला.

दबावाचा प्रश्न येतो कुठं?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हातातला पेन घेऊन आम्ही काही लिहून घेणार नाही. मग, दबावाचा प्रश्न येतो कुठं. आम्ही मागणी करणार. मागणी करणे हे काही चुकीचे नाही. लवकरात लवकर सुनावणी घ्या, अशी मागणी करणे यात चूक काय आहे. त्यांनी नियमाप्रमाणे करावं. त्यांनी नियम मोडला तर आम्ही कोर्टात जाणार, असंही अनिल परब यांनी सुनावलं.

नियमाप्रमाणे काय होते ते आम्हालाही माहीत

राहुल नार्वेकर यांनी नियमाप्रमाणे करावं. नियमाप्रमाणे काय होते आणि काय होत नाही, हे आम्हालाही चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे नार्वेकर यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न नाहीय. पण, लवकरात लवकर करावं, अशी मागणी करणे यात काही चूक आहे, असं आम्हाला वाटत नाही, असंही अनिल परब यांनी स्पष्ट केलं.

नैतिकतेच्या गोष्टी करणे उद्धव ठाकरे यांनी करून नये, असं देवेंद्र फडणवी म्हणाले. त्यावर बोलताना अनिल परब म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी सकाळी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. त्यामुळे यावर मी बोलणे योग्य होणार नसल्याचं अनिल परब यांनी म्हंटलं.

सुनावणी होईल त्यावेळी मुद्दे मांडणार

पक्ष आणि चिन्ह यांचा निर्णय निवडणूक आयोगानं शिंदे गटाला दिला. याच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत. कालच्या निकालात निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाबाबत काही उल्लेख केला आहे. ज्यावेळी सुनावणी होईल, त्यावेळी सर्व मुद्दे मांडणार आहोत, असं अनिल परब यांनी सांगितलं.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.