AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चालकाला डुलकी लागल्याने अपघात, पाचोऱ्यात भरधाव पिकअपने चौघांना उडवले

पीकअप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याने एका चौकात बसलेल्या चौघांना उडवले. यात दोघ जणांचे दोन्ही पाय निकामे झाले आहेत.

चालकाला डुलकी लागल्याने अपघात, पाचोऱ्यात भरधाव पिकअपने चौघांना उडवले
| Updated on: May 12, 2023 | 2:15 PM
Share

जळगाव : पहाटे जास्त अपघात होतात. चालकाला डुलकी येते. तरी काही चालक पहाटे गाड्या चालवतात. अशावेळी सावधानता बाळगणे गरजेचे असते. पण, छोट्याशा चुकीमुळे अपघात होत असतात. पहाटे पाचची वेळ. पीकअप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याने एका चौकात बसलेल्या चौघांना उडवले. यात दोघ जणांचे दोन्ही पाय निकामे झाले आहेत. या घटनेमुळे पहाटे उठून फिरायला जाणारे चांगलेच धास्तावले आहेत.

पीकअप-दुचाकीचा अपघात

पाचोरा तालुक्यात पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. भडगावकडून बुलढाण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव पिकअपने चौघांना उडवले. शहरातील महाराणा प्रताप चौकातील श्री दत्त मंदिरासमोर ही घटना घडली. या धडकेत चौघांपैकी दोघांचे पाय गुडघ्यापासून निकामे झालेत. दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या मदतीने तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर उपचार सुरू आहेत.

JALGAON 2 N

या चौघांना उडवले

पहाटे पाच वाजता हा अपघात झाला. भडगावच्या दिशेने बुलढाण्याकडे एमएचबीएम ७९४३ ही पिकअप भरधाव वेगाने जात होती. ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. शहरातील महाराणा प्रताप चौकात श्री दत्त मंदिरासमोर काही जण बसले होते. बसलेल्या वसंत भाईदास पाटील (वय ४२) रा. सुरत, विनोद पाटील (वय, ५०) रा. पाचोरा, अमोल वाघ (वय २७) रा. पाचोरा आणि कुंदन परदेशी (वय १७) रा. पुनगाव या चौघांना जोरदार धडक दिली.

दोन पाटलांचे दोन्ही पाय निकामी

धडक इतकी जोरदार होती की, या धडकेत वसंत पाटील आणि विनोद पाटील यांचे गुडघ्यापासून दोन्ही पाय निकामे झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पाचोरा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या व सहकार्यांच्या मदतीने जखमींना तात्काळ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिकअपच्या ड्रायव्हर आणि किन्नरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.