एसआरए प्रकल्पातील झोपडी पाडल्यापासून 5 वर्षांनी घरं विकता येतील : जितेंद्र आव्हाड

| Updated on: Mar 13, 2021 | 1:31 AM

एसआरए प्रकल्पातील झोपडी पाडल्यापासून 5 वर्षांनी घरं विकता येणार आहेत. सध्या इमारत बांधल्यानंतर 5 वर्षांपर्यंत घर विकता येत नाही.

एसआरए प्रकल्पातील झोपडी पाडल्यापासून 5 वर्षांनी घरं विकता येतील : जितेंद्र आव्हाड
पवार-शाह भेटीच्या बातम्या निव्वळ अफवा आहेत.
Follow us on

मुंबई : एसआरए प्रकल्पातील झोपडी पाडल्यापासून 5 वर्षांनी घरं विकता येणार आहेत. सध्या इमारत बांधल्यानंतर 5 वर्षांपर्यंत घर विकता येत नाही. अनेक प्रकल्प पूर्ण व्हायला 5 ते 10 वर्ष लागतात. त्यामुळे झोपडी पाडल्यापासून 5 वर्षांनी एसआरएतील घर विकण्याचा निर्णय लवकरच होणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं (Jitendra Awhad comment of sale of SRA house after 5 years in Mumbai).

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “एसआरएमधील विकलेल्या घरांप्रकरणी नोटीस पाठवल्या. याबाबत निर्णय घेण्यासाठी समिती नेमली आहे. त्यात नवाब मलिक, वर्षा गायकवाड, अनिल परब, अस्लम शेख आहेत. बिल्डिंग बांधल्यानंतर 5 वर्षात घर विकता येत नाही. त्याऐवजी त्यांची झोपडी पाडल्यापासून 5 वर्षांनी विकता येणार असा नियम बनवायला पाहिजे. तसा विचार आम्ही करतोय, समिती त्याबाबत चर्चा करून लवकर निर्णय घेईल.”


“मुंबईच्या किनारपट्टीवर अनेक ठिकाणी झोपडपट्टी आहे. बुधवार पार्क इथे 32 एकर झोपडपट्टी आहे. 16 एकरमध्ये 300 चौरस फूटाचे घर झोपडपट्टीवासीयांना दिले. इतर जागेवर म्हाडा घरे बांधेल आणि विकेल. त्यातून म्हाडाला उत्पन्न मिळेल. अशा ठिकाणी SRA आणि म्हाडा एकत्र घर बांधू, असंही त्यांनी नमूद केलं.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला या महिन्यात सुरुवात होणार आहे. वरळीमध्ये मुख्यमंत्री ठाकरे, खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. तीन ते चार वर्षात बीडीडी चाळ उभी राहणार असल्याचंही ते म्हणाले.

हेही वाचा :

‘त्याने देखील स्टेडियमला स्वत:चं नाव दिलं होतं’, जितेंद्र आव्हाडांकडून पंतप्रधान मोदींची हिटलरशी तुलना

VIDEO : जितेंद्र आव्हाड यांचं ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण

भाजपात जाऊन परत आलेल्यांना 2 वर्ष वेटिंगवर ठेवा!, राष्ट्रवादीतल्या इनकमिंगवर जितेंद्र आव्हाडांचं परखड मत

व्हिडीओ पाहा :

Jitendra Awhad comment of sale of SRA house after 5 years in Mumbai