OBC Reservation: तर मुख्यमंत्र्यांच्या शेजारी ठाण मांडून आरक्षण दिलं असतं; जितेंद्र आव्हाडांचा विरोधकांवर पलटवार

| Updated on: May 24, 2022 | 2:48 PM

OBC Reservation: सापळा कुणी लावला? कुणासाठी लावला? यामध्ये आम्ही पडत नाही. सापळा लागला की नाही लागला तो त्यांनी बघावं. सापळा लावला होता की नाही हे त्यांनी बघावं.

OBC Reservation: तर मुख्यमंत्र्यांच्या शेजारी ठाण मांडून आरक्षण दिलं असतं; जितेंद्र आव्हाडांचा विरोधकांवर पलटवार
तर मुख्यमंत्र्यांच्या शेजारी ठाण मांडून आरक्षण दिलं असतं; जितेंद्र आव्हाडांचा विरोधकांवर पलटवार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: ओबीसी आरक्षण (obc reservation) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या हातात असते तर मी त्यांच्या शेजारी ठाण मांडून करुन घेतले असते. ओबीसी आरक्षण हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तत्वांवर आधारित आहे. सर्वोच्च न्यायालयात (supreme court) हा विषय आहे. त्यावर राजकारण करणे ही आपली प्रगल्भता नाही हे दर्शवते. प्रगल्भता असेल तर तुम्हाला मान्य करावं लागेल की हे सर्व सर्वोच्च न्यायालयात पेंडीग आहे. ज्या पद्धतीने बांठिया आयोग काम करतोय डाटा गोळा करतोय, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शंभर टक्के महाराष्ट्राच्या बाजूने लागेल व ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. ते मीडियाशी बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जल आक्रोश मोर्चावरही सडकून टीका केली. फडणवीस आता उशिरा का होईना पेट्रोल आणि डिझेलवर बोलत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अध्योध्या दौरा हा सापळा होता, असा आरोप केला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सापळा कुणी लावला? कुणासाठी लावला? यामध्ये आम्ही पडत नाही. सापळा लागला की नाही लागला तो त्यांनी बघावं. सापळा लावला होता की नाही हे त्यांनी बघावं. यांच्या आणि त्यांच्या नात्यातील तो सापळा होता, अशी जोरदार टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. राजकारणात द्वेष असावा असं काही नसतं. हा मॅच्युरिटीचा भाग आहे. लोकांमधील विश्वासार्हता चहा आणि जेवणाने कमी होत नाही. ती विश्वासाने मिळालेली असते ती सहजासहजी संपत नाही, असंही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पेट्रोल डिझेलवर बोलतात हेही नसे थोडके

हनुमान चालिसा सोडून पेट्रोल – डिझेलवर बोलतायत हे नसे थोडके, असा टोलाही त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. राज्यसरकारने पेट्रोल- डिझेलवरील मुल्यवर्धीत करात कपात केल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. उशिरा का होईना पेट्रोल, डिझेल, गरीबांचे रोजगार याबद्दल त्यांना जाणीव होतेय, असा चिमटा त्यांनी काढला.

जातीवाद जास्त काळ टिकत नाही

3 मे रोजी महाराष्ट्रात काय तरी होईल अशी व्यवस्था करण्यात आली. मात्र राज्यातील जनतेचे, या मातीचं कौतुक आहे. इथे महाराष्ट्र धर्म पाळला गेला. महाराष्ट्राची जी खरी ओळख आहे ती शिवरायांनी करुन दिली आहे. ती शाहू – फुले – आंबेडकरांनी पुढे जपली. इथे धर्मांधतेला मान्यता मिळत नाही. जातीयवाद इथे जास्त काळ टिकत नाही. यांची जी इच्छा होती, जो प्लॅन होता तो महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांनी उधळून लावला. महाराष्ट्र धर्म पाळला गेला याचे कौतुकही त्यांनी केलं.