AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : सत्ता बदलायची तेव्हा बदलू, आता व्यवस्था बदलायची आहे, फडणवीसांचा शिवसेनेला थेट इशारा, गोपीनाथ मुंडेंचीही आठवण

देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला थेट इशारा दिला आहे. 'आम्ही सत्ता बदलायची तेव्हा बदलू, आता भ्रष्टाचाऱ्यांची भ्रष्ट व्यवस्था बदलायची आहे', असा घणाघात फडणवीस यांनी केलाय.

Devendra Fadnavis : सत्ता बदलायची तेव्हा बदलू, आता व्यवस्था बदलायची आहे, फडणवीसांचा शिवसेनेला थेट इशारा, गोपीनाथ मुंडेंचीही आठवण
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चाImage Credit source: TV9
sagar joshi
sagar joshi | Updated on: May 23, 2022 | 6:43 PM
Share

औरंगाबाद : पाणी प्रश्नावरून औरंगाबाद शहरातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात भाजपकडून जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो भाजप कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले. रिकाम्या घागरी, हंडे हातात घेऊन महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेविरोधात (Shivsena) जोरदार घोषणाबाजी केली. भाजपच्या मोर्चात उंटांवर, ऑटो रिक्षावरही रिकाम्या घाबरी बांधण्यात आल्या होत्या. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला थेट इशारा दिला आहे. ‘आम्ही सत्ता बदलायची तेव्हा बदलू, आता भ्रष्टाचाऱ्यांची भ्रष्ट व्यवस्था बदलायची आहे’, असा घणाघात फडणवीस यांनी केलाय. तसंच भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची आठवणही फडणवीस यांनी यावेळी काढली.

‘भावनेचं राजकारण केलं, पण थेंबभर पाणी ते देऊ शकले नाहीत’

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा संभाजीनगरच्या जनतेचा आक्रोश आहे. या सरकारनं आणि महापालिकेतील शिवसेनेनं जनतेला केवळ आश्वासनं दिली. भावनेचं राजकारण केलं, पण थेंबभर पाणी ते देऊ शकले नाहीत. आमच्या सरकारच्या काळात जी सोळाशे कोटीची योजना आम्ही मंजूर केली, त्याही योजनेत 600 कोटी महापालिकेला मागितले. अर्धा किमीचं कामंही करु शकले नाहीत. त्यामुळे हा मोर्चा नाही तर संभाजीनगरच्या जनतेचा आक्रोश आहे. याचा सामना सरकारला करावाच लागेल. संभाजीनगरला पाणी मिळाल्याशिवाय आमचा संघर्ष संपणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी शिवसेनेला दिलाय.

गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला आणि सत्ता बदल केला होता

दरम्यान, भाजपचा मोर्चा म्हणजे नौटंकी असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आलीय. त्याबाबत विचारलां असता फडणवीसांनी जोरदार पलटवार केला. ‘ज्यांनी जीवनात काहीच केलं नाही, केवळ भावनेचं राजकारण केलं, लोकांना मुर्ख बनवलं त्यांना ही नौटंकीच वाटणार. त्यांनी कधी जनतेसाठी संघर्ष केलाच नाही, ते तिथे बसून करत आहेत ती खरी नौटंकी आहे’, असं फडणवीस म्हणाले. तसंच आम्ही मागच्या काळात याच मार्गाने गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला आणि सत्ता बदल केला होता. आता सत्ताबदल नाही तर व्यवस्था बदलासाठी मोर्चा आहे. सत्ताबदल करायचा तेव्हा करूच, पण आज व्यवस्था बदलायची आहे. भ्रष्टाचाऱ्यांची भ्रष्ट व्यवस्था बदलून सामान्य माणसाला पाणी द्यायचं आहे, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार