AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : सत्ता बदलायची तेव्हा बदलू, आता व्यवस्था बदलायची आहे, फडणवीसांचा शिवसेनेला थेट इशारा, गोपीनाथ मुंडेंचीही आठवण

देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला थेट इशारा दिला आहे. 'आम्ही सत्ता बदलायची तेव्हा बदलू, आता भ्रष्टाचाऱ्यांची भ्रष्ट व्यवस्था बदलायची आहे', असा घणाघात फडणवीस यांनी केलाय.

Devendra Fadnavis : सत्ता बदलायची तेव्हा बदलू, आता व्यवस्था बदलायची आहे, फडणवीसांचा शिवसेनेला थेट इशारा, गोपीनाथ मुंडेंचीही आठवण
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चाImage Credit source: TV9
sagar joshi
sagar joshi | Updated on: May 23, 2022 | 6:43 PM
Share

औरंगाबाद : पाणी प्रश्नावरून औरंगाबाद शहरातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात भाजपकडून जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो भाजप कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले. रिकाम्या घागरी, हंडे हातात घेऊन महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेविरोधात (Shivsena) जोरदार घोषणाबाजी केली. भाजपच्या मोर्चात उंटांवर, ऑटो रिक्षावरही रिकाम्या घाबरी बांधण्यात आल्या होत्या. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला थेट इशारा दिला आहे. ‘आम्ही सत्ता बदलायची तेव्हा बदलू, आता भ्रष्टाचाऱ्यांची भ्रष्ट व्यवस्था बदलायची आहे’, असा घणाघात फडणवीस यांनी केलाय. तसंच भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची आठवणही फडणवीस यांनी यावेळी काढली.

‘भावनेचं राजकारण केलं, पण थेंबभर पाणी ते देऊ शकले नाहीत’

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा संभाजीनगरच्या जनतेचा आक्रोश आहे. या सरकारनं आणि महापालिकेतील शिवसेनेनं जनतेला केवळ आश्वासनं दिली. भावनेचं राजकारण केलं, पण थेंबभर पाणी ते देऊ शकले नाहीत. आमच्या सरकारच्या काळात जी सोळाशे कोटीची योजना आम्ही मंजूर केली, त्याही योजनेत 600 कोटी महापालिकेला मागितले. अर्धा किमीचं कामंही करु शकले नाहीत. त्यामुळे हा मोर्चा नाही तर संभाजीनगरच्या जनतेचा आक्रोश आहे. याचा सामना सरकारला करावाच लागेल. संभाजीनगरला पाणी मिळाल्याशिवाय आमचा संघर्ष संपणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी शिवसेनेला दिलाय.

गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला आणि सत्ता बदल केला होता

दरम्यान, भाजपचा मोर्चा म्हणजे नौटंकी असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आलीय. त्याबाबत विचारलां असता फडणवीसांनी जोरदार पलटवार केला. ‘ज्यांनी जीवनात काहीच केलं नाही, केवळ भावनेचं राजकारण केलं, लोकांना मुर्ख बनवलं त्यांना ही नौटंकीच वाटणार. त्यांनी कधी जनतेसाठी संघर्ष केलाच नाही, ते तिथे बसून करत आहेत ती खरी नौटंकी आहे’, असं फडणवीस म्हणाले. तसंच आम्ही मागच्या काळात याच मार्गाने गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला आणि सत्ता बदल केला होता. आता सत्ताबदल नाही तर व्यवस्था बदलासाठी मोर्चा आहे. सत्ताबदल करायचा तेव्हा करूच, पण आज व्यवस्था बदलायची आहे. भ्रष्टाचाऱ्यांची भ्रष्ट व्यवस्था बदलून सामान्य माणसाला पाणी द्यायचं आहे, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप