गावाकडून शहराकडे होणारे स्थलांतर सरकार थांबवणार; गावागावात विकास कार्यक्रम राबविले जाणार

| Updated on: Mar 09, 2023 | 3:43 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सांगितले की, या माध्यमातून युवकांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी सरकार नवनव्या योजना आखत असल्याचेही त्यांनी सांगितले.

गावाकडून शहराकडे होणारे स्थलांतर सरकार थांबवणार; गावागावात विकास कार्यक्रम राबविले जाणार
Follow us on

मुंबईः रोजगाराचा प्रश्न गंभीर होत असतानाच शिंदे-फडणवीस सरकारने मात्र आता त्याच्यावर उपाय शोधून काढला आहे. रोजगारासाठी गावा गावातून होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी आता रोजगार आणि स्वयंरोजगाराची आरखडा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात मांडले आहेत. शहराकडे होणारे स्थलांतर थांबावे यासाठी राज्यातील 500 ग्रामपंचायतींमधून कौशल्य विकास कार्यक्रम सुरु करण्याचा योजना शिंदे-फडणवीस सरकारने आखली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये रोजगाराविषयी महत्वाची तरतूद केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पामध्ये रोजगारबरोबरच ग्राम विकासासाठी त्यांनी महत्वाची तरतूद केली आहे.

यावेळी त्यांनी गावा गावातील युवकांना रोजगार मिळावा, तसेच ग्रामपंचायतींचा त्यामध्ये सहभाग असावा यासाठीही त्यांनी योजना आकली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, गावाागावातून होणारे युवकांचे स्थलांतर रोखण्यासाठी 500 ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम सुरु करण्यात येणार आहे.

गावाकडून शहराकडे होणारे स्थलांतर यामुळे थांबण्यास मदत होणार आहे. स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगारसाठी प्रयोगिक तत्वावर 500 ग्रामपंचायतीमधून कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

त्याचबरोबर शहरी भागातही मनगरपालिका, जिल्हा परिषद शाळांमध्ये याद्वारे कार्यक्रम आखला जाणार आहे. यासाठी 2023-24 मध्ये 200 शाळांमध्ये हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.

तसेच कौशल्य वर्धानाद्वारे युवकांना रोजगारक्षम बनवण्साठी पुढील तीन वर्षात 2 हजार 307 कोटींची तरतूद अतिरिक्त गुंतवणूक 500 औद्योगिक संस्थांचा दर्जाही वाढविण्यात येणार आहे.

तसेच 75 संस्थांचे आधुनिकीकरण करून त्याद्वारे युवकांना रोजगाराचे धडे देण्यात येणार आहेत. या योजनांसाठी 610 कोटींचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सांगितले की, या माध्यमातून युवकांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी सरकार नवनव्या योजना आखत असल्याचेही त्यांनी सांगितले.