Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात पंतप्रधान मोदींनी राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. यंदाच्या सोहळ्याची थीम वंदे मातरमची १५० वर्षे आणि विकसित भारत आहे, ज्यामध्ये युवा शक्तीचे योगदान केंद्रस्थानी आहे. लाल किल्ल्यावरच्या भाषणाकडे देशाचे लक्ष लागले आहे.
देशभरात स्वातंत्र्यदिनाचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. या उत्साहाच्या वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर सर्वप्रथम राष्ट्रध्वज फडकवला होता आणि तेव्हापासून प्रत्येक स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतात.
आज पंतप्रधान मोदी सलग तेराव्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतील. यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची मुख्य थीम वंदे मातरमची १५० वर्षे आणि विकसित भारत अशी आहे, ज्यात २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी युवा शक्तीचे योगदान महत्त्वाचे मानले आहे. लाल किल्ल्यावरील कार्यक्रमासाठी पीएम विश्वकर्मा योजनेमधील कारागीर, मुद्रा योजनेमधील महिला उद्योजक, स्वनिधी योजनेमधील फेरीवाले, शेतकरी आणि माय भारतचे स्वयंसेवक यांसारख्या विविध क्षेत्रांतील सुमारे ५००० ते ६००० विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. राजघाटावरील श्रद्धांजलीनंतर पंतप्रधान मोदी आता लाल किल्ल्याकडे रवाना झाले असून, त्यांच्या भाषणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.
Published on: Aug 15, 2026 09:13 AM
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात

