मुंबई : मुंबईकरांना (Mumbai News) दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईतील तलावं तुडुंब भरली आहे. अवघ्या चार दिवसांत (Mumbai Lake News) मुंबईला पाणी पुरवठा करणारं चौथं तलावही तुडुंब भरुन वाहू लगालंय. त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न पुढच्या एप्रिल महिन्यापर्यंत तरी मिटला आहे. मुंबईला पाणी (Mumbai Lake Water Level) पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात गेल्या दोन आठवड्यामध्ये जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबईतील तलावांची पाणी पातळी कमालीची वाढली असून मुंबईत आता एप्रिलपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. गुरुवारी संध्याकाळी मुंबईला पाणी पुरवठा करणारा तुळशी तलावही तुडुंब भरलाय. सातही तलावांमध्ये मिळून आता 11,38,096 दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा जमा झालाय. मुंबई दर दिवशी लागणाऱ्या पाणीसाठ्याचा विचार करता, आताचा पाणीसाठा हा पुढच्या एप्रिल महिन्यापर्यंत पुरेल, इतका आहे, असं सांगितलं जातंय. पुढचे नऊ महिने तरी मुंबईला आता पाण्याची चिंता सतावणार नाही, असं पाणीसाठ्याच्या आकरेवारीवरुन सध्यातरी स्पष्ट झालंय.
मुंभईला अप्पर वैतरण, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. यापैकी तीन तलावं सध्या ओव्हरफ्लो झाली आहेत. जून महिन्याच्या अखेरीस मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे 27 जूनपासून 10 टक्के पाणी कपात करण्यात आलेली. अखेर जुलैच्या सुरुवातीपासून पावसानं जोरदार कमबॅक केल्यानं मुंबईतील तलावं तुडुंब भरली आहेत.
मुंबईच्या तलावात 25 टक्के पाणीसाठा झाल्यानंतर पाणीकपात मागे घेण्यात आली होती. दरम्यान, सध्याच्या घडीला कोणत्या तलावात किती टक्के पाणी साठा आहे, त्यावर एक नजर टाकुया…