गिरणी कामगार ‘संप’ला की संपवला? कुणामुळे देशोधडीला लागला? 82 च्या संपावेळीच्या मागण्या काय होत्या?
गिरणी कामगार असणं हा त्या काळात एक स्टेटस सिम्बॉल होता. मी गिरणी कामगार आहे, असं कर्मचारी रुबाबाने सांगत. पण, त्याचा हा रुबाबही संपला आणि त्यापाठोपाठ गिरणी कामगारही... तो का संपला? आंदोलनातील अवास्तव मागण्या की संघटनेत नेत्यांचा वाढता हस्तक्षेप? गिरणी कामगार संपला की संपवला गेला? 1982 च्या संपावेळी नक्की काय झालं होतं? या आंदोलनाची ठिणगी नक्की कुठे पडली?

मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. कधी काळी मोठ्या प्रमाणात असलेल्या कापड गिरण्यांच्या बळावरच मुंबईला ही ओळख मिळाली. गिरणीचा भोंगा वाजला की अवघी मुंबापुरी दणाणून जायची. त्याच वाजणाऱ्या भोंग्यावर लोक आपल्या घड्याळाला चावी देत असत. नेमके किती वाजले हे सांगणारा गिरणीचा भोंगा लुप्त झाला. सरकारी नोकरीपेक्षा गिरणी कामगार असणं तेव्हा प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जायचं. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातला घरटी माणूस हा गिरण कामगार होता. गिरण सुटण्याची वेळ झाली की शक्यतो लोकं बाहेर निघायची नाहीत. कारण, गिरणीतून बाहेर पडणाऱ्या कामगारांचा लोंढा अशा रीतीने येत असे की जणू समुद्राला आलेली भरती. काही काळी मुंबईचे वैभव असणारी गिरणी आणि गिरणी कामगार कसा संपला? त्याला जबाबदार कोण? गिरणी कामगारांचा 82 मध्ये झालेल्या संपाची परिणीती काय? संप यशस्वी झाला की नाही? त्यानंतर काय परिस्थिती होती? जाणून घ्या. ...
