मुंबई : मुंबईतील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करणारा खळबळजनक अहवाल प्रजा फाऊंडेशनने प्रसिद्ध केला आहे. गेल्या काही वर्षात मुंबईत बलात्कार, विनयभंग आणि दंगली यांसारख्या अत्यंत गंभीर घटनांमध्ये वाढ झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातील काही ठळक आकडेवारी :
पोलिसांसंदर्भात अहवालात काय माहिती आहे?
मुंबईतील प्रतिनिधींनी या सर्व अत्याचारांबाबत शासकीय-प्रशासकीय पातळीवर काय आवाज उठवला, याचाही धांडोळा प्रजा फाऊंडेशनने आपल्या अहवालातून केला आहे. 2017 पासून 2018 पर्यंतच्या अधिवेशनांमध्ये बलात्कार विषयावर दक्षिण मुंबईच्या आमदारांनी केवळ 5, ईशान्य मुंबईच्या आमदारांनी 2, तर उत्तर मुंबईच्या आमदारांनी 2 प्रश्न विचारले आहेत.
एकंदरीत मुंबईतील वाढती गुन्हेगारी चिंताजनक असून, शासकीय-प्रशासकीय पातळीवरही निराशेचं वातावरण आहे. त्यामुळे याचा पोलिस यंत्रणेसह राज्याच्या गृहविभागाला गांभिर्याने विचार करावा लागेल, हे निश्चित.