“सर्वांच्या संमतीने उद्या नावाची घोषणा”; या काँग्रेस नेत्याने विजयाची खात्री दिली…

| Updated on: Feb 05, 2023 | 11:30 PM

सध्या देशात वास्तविक पाहता भाजपविरोधी एकजूट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसवर अशा पद्धतीने टीका करणे अपेक्षित नव्हतं असंही त्यानी राव यांच्याबद्दल बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

सर्वांच्या संमतीने उद्या नावाची घोषणा; या काँग्रेस नेत्याने विजयाची खात्री दिली...
Follow us on

मुंबईः तेलंगणाच्या मुख्यमंत्री के. सी. आर. राव यांनी आज नांदेडमध्ये बोलताना काँग्रेसवर टीका केली. त्यावर बोलताना काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनीही त्यांच्यावर जोरदार पलटवार करत के. सी. आर. राव यांच्या काँग्रेसवरील टिकेला गांभीर्याने घेण्याची गरज नसलल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. के. सी. आर. राव यांच्या नांदेडमधील सभेला उपस्थिती कमी होती, त्यामुळे त्यांना त्याच्या सभेसाठी लोकं ही तेलंगणामधून आणावी लागली असा हल्लाबोलही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

तर दुसरीकडे पुण्याच्या पोटनिवडणुकीविषयी जोरदार चर्चा सुरू असल्याने त्या पोटनिवडणुकीविषयी सर्व पक्ष नेमकी काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

त्याबद्दल काँग्रेसची नेमकी भूमिका काय असणार याबाबत बोलताना अशोक चव्हाण यांनी सांगितले की, कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या उमेदवाराबाबत कोणतीही अडचण नाही. ही पोटनिवडणूक सगळं व्यवस्थित होणार आहे.

त्यामुळे उद्या कसब्याच्या पोटनिवडणुकीचा अर्ज भरणार असून सर्वांच्या संमतीने उद्या नावाची घोषणा अपेक्षित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तर त्याच वेळी त्यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीवरून तांबे पुतापित्रांच्या भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.त्यावर बोलताना ते म्हणाले की, पक्षाध्यक्षांनी एबी फॉर्मच्या संदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

तर तांबे जे काही म्हणाले होते याबाबतीत अखिल भारतीय काँग्रेसच्या पातळीवर माहिती घेऊन, त्याचा योग्य तो खुलासा पक्षाध्यक्ष करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

के. सी. आर. राव यांच्या बीआरएस पक्षावर टीका करताना त्यांनी नांदेडमधील राजकीय परिस्थितीचाही आढावा घेतला. काँग्रेसमधील काही नेतेत बीआरएसमध्ये सामील झाल्याच्या चर्चा होत्या मात्र तसे काही झाले नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे मात्र टीका करताना त्यांनी राजकीय भान ठेवले पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

सध्या देशात वास्तविक पाहता भाजपविरोधी एकजूट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसवर अशा पद्धतीने टीका करणे अपेक्षित नव्हतं असंही त्यानी राव यांच्याबद्दल बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

त्यांना महाराष्ट्रात यायचे असल्याने काहीतरी त्यांना बोलायचे होते म्हणून आणि काँग्रेस विरोधी वक्तव्य केले असावे असं मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.