BREAKING | मुंबई उच्च न्यायालयाची अचानक लिफ्ट बंद पडली, सात जण अडकले, प्रचंड धावपळ, अखेर…

| Updated on: Apr 03, 2023 | 5:43 PM

मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीत आज लिफ्ट बंद पडल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं.

BREAKING | मुंबई उच्च न्यायालयाची अचानक लिफ्ट बंद पडली, सात जण अडकले, प्रचंड धावपळ, अखेर...
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात अनेक मोठमोठ्या प्रकरणांचा न्यायनिवाडा केला जातो. मुंबई उच्च न्यायालयाबद्दल महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या मनात आदराची भावना आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा परिसर आणि इमारतही आकर्षित आहे. अनेकजण मुंबईत येतात तेव्हा लांबून किंवा बाहेरुन मुंबई उच्च न्यायालय जरुर पाहतात. याशिवाय मुंबई उच्च न्यायालयात नोकरी मिळावी यासाठी अनेक तरुण प्रयत्न करत असतात. तर अनेकजण आपल्या वेगवेगळ्या समस्या, तक्रार आणि न्यायासाठी मुंबई उच्च न्यायालयाची पायरी चढत असतात. अशा महत्त्वपूर्ण मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीत आज अनपेक्षित आणि धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीत आज लिफ्ट बंद पडल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर ही लिफ्ट बंद पडली. या लिफ्टमध्ये तब्बल सात जण होते. यामध्ये 6 पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता. संबंधित घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिथे रेस्क्यू ऑपरेशन राबवलं.

सात जणांना वाचवण्यात यश

अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नांमुळे अडकलेल्या सर्व सातही जणांना बाहेर काढण्यात यश आलं. लिफ्ट उघडल्यानंतर अडकलेल्या सातही जणांनी सुटकेचा श्वास सोडला. सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. कुणालाही कोणताही त्रास होत नसल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी लिफ्ट कंपनीचे अधिकारी देखील दाखल झाले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या संकुलात अशाप्रकारची घटना घडली असल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई उच्च न्यायालय हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं. अशा ठिकाणी लिफ्टची वेळोवेळी पाहणी केली जात नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. इतक्या महत्त्वपूर्ण ठिकाणी अशा प्रकारची घटना कशी घडू शकते? असा प्रश्न उपस्थित होतोय. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नाही. पण संबंधित घटना धोकादायक होती. या प्रकरणी काही चौकशी होते का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.