Rohit Pawar : दोषमुक्तीसाठी रोहित पवार यांनी केला अर्ज, काय आहे प्रकरण ?
कथित शिखर बँक घोटाळाप्रकरणी रोहित पवारांनी मनी लाँडरिंगमधून दोषमुक्त होण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टनंतर हा नवा टप्पा आहे. मुंबई सत्र न्यायालयाने ईडीला १७ मार्चपर्यंत त्यांची भूमिका मांडण्याचे निर्देश दिले आहेत. कन्नड साखर कारखान्याच्या लिलावावरून आरोप झाले होते. आता रोहित पवारांना दिलासा मिळतो की ईडी आव्हान देते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
- Reporter Brijbhan Jaiswar
- Updated on: Mar 7, 2026
- 8:12 am
Varsha Usgaonkar : अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांना मोठा धक्का, पोलीस ठाण्यात घेतली धाव, नेमकं काय घडलं ?
ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि मृणालिनी जांभळे यांच्यासह अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. दिग्दर्शक जाधव याने त्यांना डोंबिवलीतील प्रकल्पात गुंतवणुकीचे आमिष दाखवून चांगल्या परताव्याचे वचन दिले होते. सुरुवातीला काही पैसे दिल्यावर नंतर त्याने परतावा देणे बंद केले. तक्रारदारांनी शिवाजी पार्क पोलिसांत तक्रार नोंदवली असून, जाधवविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
- Reporter Brijbhan Jaiswar
- Updated on: Mar 5, 2026
- 8:12 am
Vijay Mallya : स्पष्ट सांगा, भारतात कधी परत येणार ? विजय मल्ल्याला हायकोर्टाने झापलं
एफईओ कायदा आणि त्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याच्या आदेशाला विजय मल्ल्याने कोर्टात आव्हान दिलं, मात्र त्याला आता कोर्टानेच झापलंय. जोपर्यंत तो भारतात परतण्याच्या त्याच्या योजनांचे प्रतिज्ञापत्र दाखल करत नाही तोपर्यंत त्याच्या याचिकेवर सुनावणी केली जाणार नाही असं न्यायालयाने सुनावलं आहे.
- Reporter Brijbhan Jaiswar
- Updated on: Dec 24, 2025
- 11:45 am
झिशान सिद्दीकी यांची सुरक्ष कमी केली, न्यायालयाचे सरकारला खडेबोल
राष्ट्रवादीचे नेते झिशान सिद्दिकी यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, या निर्णयावरून न्यायालयानं नाराजी व्यक्त करतानाच राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
- Reporter Brijbhan Jaiswar
- Updated on: Dec 11, 2025
- 7:28 pm
हॉटेल, रेस्टॉरंट, पब आणि बार अग्निशमन दलाच्या रडारवर, घेतला मोठा निर्णय
BMC Fire Brigade : नववर्षाच्या स्वागत समारंभांच्या पार्श्वभूमीवर दिनांक 22 ते दिनांक 28 डिसेंबर 2025 दरम्यान मुंबई अग्निशमन दलाने 'विशेष अग्निसुरक्षा मोहीम' राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
- Reporter Brijbhan Jaiswar
- Updated on: Dec 9, 2025
- 9:54 pm
Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा झटका! आणखी ११२० कोटींची मालमत्ता जप्त
Anil Ambani Reliance: अनिल अंबानी यांना एकामागून एक मोठे झटके बसले आहेत. त्यांच्यामागे यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लावला आहे. त्यातच आता येस बँक घोटाळा प्रकरणात त्यांची ११२० कोटींची मालमत्ता जप्त करम्यात आली आहे. आतापर्यंत त्यांची 10 हजार 117 कोटींच्या मालमत्तेवर टाच आली आहे.
- Reporter Brijbhan Jaiswar
- Updated on: Dec 7, 2025
- 12:35 pm
मुंबई उच्च न्यायालयातील कामकाजाचे आता थेट प्रक्षेपण; सोमवारपासून पाहा ऑनलाईन सुनावणी
Mumbai High Court proceedings now live : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज आता येत्या सोमवारपासून (7 जुलै) थेट पाहता येणार आहे. याबाबतची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात याबाबतचे संकेत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी दिले होते.
- Reporter Brijbhan Jaiswar
- Updated on: Jul 5, 2025
- 9:22 am
आयआयटी मुंबईमध्ये घुसखोरी करत बनवले व्हिडिओ, आरोपीला अटक, चौकशीतून धक्कादायक खुलासे
आयआयटी मुंबईमध्ये घुसखोरी करत 14 दिवस बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बिलाल अहमद फयाज अहमद तेली याला अटक करण्यात आली आहे.
- Reporter Brijbhan Jaiswar
- Updated on: Jul 1, 2025
- 8:53 pm
उद्धव ठाकरे यांचे दोन शिलेदार शिंदे गटात; ठाकरे गटाला मुंबईत पुन्हा मोठा धक्का
आज कोणीतरी म्हणालं की शिवसेनेला अमित शाह आणि मोदीजींच नाव दिले पाहिजे. अरे मोदी आणि अमित शाह यांचा अभिमान आहे आम्हाला. बाळासाहेबांचं स्वप्न कोणी पूर्ण कोणी केलं? 370 कलम हटवले, राम मंदिर बनवले. बाळासाहेबांच स्वप्न पूर्ण केले. आम्ही महाराष्ट्रासाठी दिल्लीत जातो. तुम्ही राहुल गांधीना मुजरे करायला दिल्लीत जाता, असा हल्लाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
- Reporter Brijbhan Jaiswar
- Updated on: Mar 9, 2025
- 10:45 pm
Shraddha Murder Case : अनेक तुकडे करून ठार मारलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचा अचानक मृत्यू, नेमकं काय घडलं?
प्रियकराने अनेक तुकडे करून ठार मारलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचं अचानक निधन झालं आहे. श्रद्धाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
- Reporter Brijbhan Jaiswar
- Updated on: Feb 9, 2025
- 1:19 pm
धनंजय देशमुख यांच्या आंदोलनावर गुणरत्न सदावर्तेंची टीका; म्हणाले, ‘कायदा-सुव्यवस्थाचा प्रश्न उभा करणाऱ्यांवर…’
संतोष देशमुख या बीडच्या मस्साजोग गावाच्या सरपंचांच्या हत्येचा तपास वेगाने करण्याची मागणी करत त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या आंदोलनावर आक्षेप घेतला आणि त्याला राजकीय षडयंत्र तर नाही ना? असा संशय व्यक्त केला. त्यांनी देशमुख कुटुंबियांना पोलिसांना मदत करण्याचे आणि न्यायालयात स्टेटमेंट देण्याचे आवाहन केले. या प्रकरणात मनोज जरांगे यांच्या भूमिकेवरही सदावर्ते यांनी टीका केली.
- Reporter Brijbhan Jaiswar
- Updated on: Jan 13, 2025
- 8:02 pm
500 च्या बनावट नोटा छापायचे, मुंबई पोलिसांनी सिनेस्टाईल मुस्क्या आवळल्या, सापळा रचला आणि…
मुंबईतील भायखळा पोलिसांनी बनावट 500 रुपयांच्या नोटा छापणाऱ्या आणि वितरित करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी गुप्त बातमीवरून सापळा रचून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 200 बनावट नोटा, प्रिंटिंग मशीन, लॅमीनेशन मशीन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
- Reporter Brijbhan Jaiswar
- Updated on: Jan 12, 2025
- 9:43 pm