AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या जागतिक दबदब्याचा अनुभव कुठे आला?, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं

डबल इंजिन सरकारमुळं महाराष्ट्राचा विकास होत आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्या जोडीमुळं विकासाला गती आली आहे. पायाभूत सुविधांवर ३०० किलोमीटरच्या ट्रॅकसाठी आम्ही पुढं जात आहोत.

भारताच्या जागतिक दबदब्याचा अनुभव कुठे आला?, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Updated on: Jan 19, 2023 | 6:55 PM
Share

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबई येथील बीकेसी मैदानावर जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषणं झाली. त्यानंतर बोलताना पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले, गेल्या आठ वर्षांत भाजप सरकारने देशात बदल घडविला. आधुनिकतेवर खर्च केला जात आहे. देशात घर, टॉयलेट, वीज, पाणी, गॅस, मोफत उपचार, मेडिकल कॉलेज, आयआयटी, आयआयएम यांची निर्मिती होत आहे. आधुनिक सुविधा देशात तयार होत आहेत. आजची गरज काय आहे, त्यावर काम सुरू आहे. जगातील अर्थव्यवस्था बेहाल आहेत. अशावेळी भारतातील ८० कोटी लोकांना मोफत रेशन देत आहे.

देश मोठे स्वप्न पाहून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. गरिबांची चर्चा करणे, दुसऱ्यांना मदत करण्यात वेळ घालविला गेला. जगाला भारताच्या संकल्पांना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाओसमधून अनुभव सांगत होते. त्यांनी गुंतवणुकीसाठी ओमओयू केले.

हा सकारात्मक अनुभव देशात येत आहे. आपल्या सामर्थ्याचा अतिशय चांगला उपयोग देश करत आहे. भारत आत्मविश्वासानं भरलेला आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

डबल इंजिनमुळे विकासाची गती

डबल इंजिन सरकारमुळं महाराष्ट्राचा विकास होत आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्या जोडीमुळं विकासाला गती आली आहे. पायाभूत सुविधांवर ३०० किलोमीटरच्या रस्त्यासाठी आम्ही पुढं जात आहोत. रेल्वेचे आधुनिकीकरण होत आहे. राज्यातील रेल्वे कनेक्टिव्हीटीने काम होत आहे. साफसफाई जोरानं होत आहे.

मल्टिमॉडल हब

रेल्वे स्थानकांना विमानतळासारखं विकसित केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्थानकही विकसित होत आहे. लोकल आणि रेल्वेसाठी प्रयत्न केला जात आहे. बस, मेट्रो, टॅक्सी, रेल्वे ही सर्व मल्टिमॉडल कनेक्टिव्ही मोठ्या शहरात विकसित केले जात आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.

येणाऱ्या काही वर्षात मुंबईचा विकास केला जात आहे. सर्वांसाठी येथे राहणे सुविधाजनक राहील. मुंबई येणे-जाणे सुलभ होणार आहे. नवीन प्रकल्प मुंबईला नवी ताकद देत आहेत, असंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.