AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या जागतिक दबदब्याचा अनुभव कुठे आला?, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं

डबल इंजिन सरकारमुळं महाराष्ट्राचा विकास होत आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्या जोडीमुळं विकासाला गती आली आहे. पायाभूत सुविधांवर ३०० किलोमीटरच्या ट्रॅकसाठी आम्ही पुढं जात आहोत.

भारताच्या जागतिक दबदब्याचा अनुभव कुठे आला?, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Updated on: Jan 19, 2023 | 6:55 PM
Share

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबई येथील बीकेसी मैदानावर जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषणं झाली. त्यानंतर बोलताना पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले, गेल्या आठ वर्षांत भाजप सरकारने देशात बदल घडविला. आधुनिकतेवर खर्च केला जात आहे. देशात घर, टॉयलेट, वीज, पाणी, गॅस, मोफत उपचार, मेडिकल कॉलेज, आयआयटी, आयआयएम यांची निर्मिती होत आहे. आधुनिक सुविधा देशात तयार होत आहेत. आजची गरज काय आहे, त्यावर काम सुरू आहे. जगातील अर्थव्यवस्था बेहाल आहेत. अशावेळी भारतातील ८० कोटी लोकांना मोफत रेशन देत आहे.

देश मोठे स्वप्न पाहून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. गरिबांची चर्चा करणे, दुसऱ्यांना मदत करण्यात वेळ घालविला गेला. जगाला भारताच्या संकल्पांना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाओसमधून अनुभव सांगत होते. त्यांनी गुंतवणुकीसाठी ओमओयू केले.

हा सकारात्मक अनुभव देशात येत आहे. आपल्या सामर्थ्याचा अतिशय चांगला उपयोग देश करत आहे. भारत आत्मविश्वासानं भरलेला आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

डबल इंजिनमुळे विकासाची गती

डबल इंजिन सरकारमुळं महाराष्ट्राचा विकास होत आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्या जोडीमुळं विकासाला गती आली आहे. पायाभूत सुविधांवर ३०० किलोमीटरच्या रस्त्यासाठी आम्ही पुढं जात आहोत. रेल्वेचे आधुनिकीकरण होत आहे. राज्यातील रेल्वे कनेक्टिव्हीटीने काम होत आहे. साफसफाई जोरानं होत आहे.

मल्टिमॉडल हब

रेल्वे स्थानकांना विमानतळासारखं विकसित केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्थानकही विकसित होत आहे. लोकल आणि रेल्वेसाठी प्रयत्न केला जात आहे. बस, मेट्रो, टॅक्सी, रेल्वे ही सर्व मल्टिमॉडल कनेक्टिव्ही मोठ्या शहरात विकसित केले जात आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.

येणाऱ्या काही वर्षात मुंबईचा विकास केला जात आहे. सर्वांसाठी येथे राहणे सुविधाजनक राहील. मुंबई येणे-जाणे सुलभ होणार आहे. नवीन प्रकल्प मुंबईला नवी ताकद देत आहेत, असंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.

Follow Us
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे...
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे....
भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा! खरातच्या दरबारात कुणा कुणाची नांदी, अंजली..
भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा! खरातच्या दरबारात कुणा कुणाची नांदी, अंजली...
मोठी बातमी! आता सकाळचा चहा पोळणार... दुधाला महागाईची उकळी.....
मोठी बातमी! आता सकाळचा चहा पोळणार... दुधाला महागाईची उकळी......
मोठी घडामोड! केंद्र सरकारने थांबवली साखर निर्यात; भाव वाढीमागचं.......
मोठी घडामोड! केंद्र सरकारने थांबवली साखर निर्यात; भाव वाढीमागचं........
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.