राजगृहात प्रकाश आंबेडकर -वसंत मोरे यांच्यात दिलजमाई?

| Updated on: Mar 29, 2024 | 3:23 PM

Vasant More-Prakash Ambedkar : पुण्यातील लोकसभा निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हं दिसत आहेत. पुण्यात भाजपने मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. तर आता ताज्या घडामोडीनुसार, वसंत मोरे हे वंचितचा चेहरा असू शकतात. काय आहे अपडेट

राजगृहात प्रकाश आंबेडकर -वसंत मोरे यांच्यात दिलजमाई?
झाली का दिलजमाई?
Follow us on

पुण्यात तिरंगी लढत पाहायला मिळू शकते. मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे वंचितचा चेहरा होऊ शकतात. त्यामुळे बारामती, शिरुर प्रमाणेच पुण्यनगरीत पण चुरस पाहायला मिळू शकते. ही लोकसभा निवडणूक हायहोल्टेज ठरण्याची दाट शक्यता आहे. वसंत मोरे यांनी आज सकाळीच ठरल्याप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमधील सूर जुळल्याचे दिसून आले. दोन्ही नेत्यांच्या या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांचा हास्यविनोद आणि वसंत मोरे यांचा खुललेला चेहरा बरेच काही सांगून जात होता.

बाळासाहेब आणि वसंत मोरे यांची भेट

वसंत मोरे यांनी आज मुंबईत दादर येथील प्रकाश आंबेडकर यांच्या राजगृहात प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. मोरे हे वंचितकडून पुणे लोकसभेची निवडणूक लढवू इच्छित आहेत. त्यादृष्टीने झालेली ही गाठभेट बरेच काही सांगून गेली. वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा चंग बांधला. त्यांनी बड्या नेत्यांच्या भेटीगाठींचे सत्र सुरु केले होते. महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर ते अपक्ष शड्डू ठोकतील असे वाटत होते. पण त्यांनी सर्वांचाच अंदाज चुकवत वंचितचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय व्यक्त केला. त्यासाठीच ते बाळासाहेब आंबेडकर यांच्या भेटीला मुंबईत पोहचले.

हे सुद्धा वाचा

प्रकाश आंबेडकर यांच्या प्रयोगाला यश?

मागील लोकसभेत भारिप-बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात वंचितचा प्रयोग घडवून आणला. त्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये अभूतपूर्व विजय खेचून आणण्यात यश आले. अर्थात एमआयएमसोबतच्या या प्रयोगाविषयी अनेक मत प्रवाह नंतर समोर आले. त्यातून आंबेडकर यांना काय मिळाले, याचा हिशेब काहींनी बोलून दाखवला. त्यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना सोबत घेत, बाळासाहेब पुन्हा वंचितचा नवीन प्रयोग करु पाहत आहेत. अर्थात मनोज जरांगे यांची भूमिका उद्या 30 मार्च रोजी समोर येईल. पण दोन्ही नेत्यांची अंतरवाली सराटीत खलबतं झाली. त्यातून आता काय घडते हे लवकरच राजकीय पटलावर समोर येईलच. पण तुर्तास अनेक जण वंचितकडे आशेने पाहत आहेत, हे ही नसे थोडके.