इंडिया नाव हटवल्यास नोटाबंदी करावी लागणार?, विजय वडेट्टीवार यांची भीती काय?

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्द्यांवर राज्य सरकार आणि केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. नोटाबंदी, इंडिया नावापासून ते मराठा आंदोलनावर त्यांनी भाष्य केलं आहे.

इंडिया नाव हटवल्यास नोटाबंदी करावी लागणार?, विजय वडेट्टीवार यांची भीती काय?
vijay wadettiwarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 07, 2023 | 9:51 AM

बुलढाणा | 7 सप्टेंबर 2023 : केंद्र सरकारने इंडिया या शब्दाऐवजी भारत शब्द वापरण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं असून त्यात याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. इंडिया शब्द बदलण्यासाठी केंद्र सरकार विधेयक आणणार असल्याचीही चर्चा आहे. तशी चर्चाही देशात सुरू आहे. एवढेच नव्हे तर या निमित्ताने इंडिया आणि भारत या नावावरून दोन गट निर्माण झाले आहेत. पण इंडिया शब्द बदलला आणि भारत हा शब्द घेतला तर अनेक ठिकाणी तो बदल करावा लागणार आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना तर इंडिया ऐवजी भारत शब्द वापरल्यास नोटाबंदी होण्याचीही भीती वाटत आहे.

विजय वडेट्टीवार मीडियाशी संवाद साधत होते. केंद्र सरकार संविधानातील इंडिया शब्द बदलण्यासाठी विधेयक आणणार आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हे घाबरण्याचे लक्षण आहे. इंडिया म्हणजे भारत हे संविधानात लिहिले आहे. मग नोटांवर ही भारत लिहावे लागेल, कारा नोटबंदी मग. हे सगळं इंडिया आघाडीला घाबरून चालले आहे. राहुल गांधी यांच्या दहशतीमुळेच हे सुरू आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

राज्यभर पडसाद

जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीमार झाल्यानंतर त्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. अनेक ठिकाणी मोर्चे, निदर्शने सुरू आहेत. काही ठिकाणी जाळपोळ सुरू आहे. तर काही ठिकाणी बंद पुकारला जात आहे. राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्यात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचीही मागणी होत आहे. जालन्यात मराठा आंदोलनावेळी नेमके किती लोक जखमी झाले होते याबाबत अजूनही ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबतचा आकडाच सांगितला आहे.

जखमी किती?

मराठा आंदोलन चिरडण्याचा काम सरकारने केले आहे. फक्त आश्वासने दिले होते, मात्र आता मराठ्यांवर लाठी चालवण्यात आली आहे. या हल्ल्यात तब्बल 124 आंदोलक जखमी झाले आहेत, अशी माहिती देतानाच तुम्ही माफी मागितली. याचा अर्थ तुम्ही दोषी आहात. हे आंदोलन चिरडण्याचं काम झालं. ते सरकार पुरस्कृत होतं हे सिद्ध झालं आहे. तुम्ही चुकीचं वागलात म्हणूनच तुम्ही माफी मागत आहात, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

टीव्ही एक रिमोट तीन

विजय वडेट्टीवार यांनी यावेळी राज्य सरकारवरही टीका केली. आताचे सरकार म्हणाजे तिजोरी लुटणारे सरकार आहे. पूर्वी आली बाबा चाळीस चोर म्हणायचे. मात्र आता दोन आली बाबा 80 चोर आहेत, अशी राज्याची स्थिती आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. 56 इंच छाती फुगवून सांगणाऱ्यांना दुसऱ्याची घर फोडायची वेळ आलीय. कारण तुम्ही स्वकर्तुत्वाने काहीही मिळविले नाही. टीव्ही एक आणि रिमोट तीन अशी राज्याची स्थिती झाली आहे. ज्याला जे बटण दबायचे ते दाबतो आणि तिजोरी लुटतो, असे काम राज्यात सुरू आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.