Nashik | नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने 32 हजार 172 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू…

| Updated on: Aug 17, 2022 | 10:58 AM

नाशिक जिल्ह्यातील प्रमुख त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झालीयं. दारणा, गंगापूर आणि पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालीयं.

Nashik | नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने 32 हजार 172 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू...
Follow us on

लासलगाव : नाशिक (Nashik) जिल्हात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा संततधार पावसाला सुरूवात झालीयं. यामुळे धरणातील पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. गंगापूर धरणातून काल पाण्याचा विसर्ग करण्यात आलायं. नाशिक जिल्हातील जवळपास सर्वच धरणे ओव्हर फ्लो (Over flow) झाली असून धरणातून पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. यामुळे जिल्हातील नद्यांना पुरस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून (Administration) नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलायं. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यात संततधार पाऊस सुरूयं.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यात संततधार पाऊस सुरू

नाशिक जिल्ह्यातील प्रमुख त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झालीयं. दारणा, गंगापूर आणि पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालीयं. कारण दारणा, गंगापूर आणि पालखेड धरणातून जो पाण्याचा विसर्ग केला जातोयं, तो मधमेश्वर धरणामध्ये होतो आहे.

हे सुद्धा वाचा

नांदूर मधमेश्वर धरणातून 61 टीएमसी 40 लक्ष घनफूट पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले

नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीनदी पत्रातून 32 हजार 172 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येते आहे. आज सकाळी 6 वाजेपर्यंत या पावसाच्या हंगामात नांदूर मधमेश्वर धरणातून 61 टीएमसी 40 लक्ष घनफूट पाणी गोदावरी नदीतून सोडण्यात आले. यामुळे आता जाकवाडी धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून जायकवाडी धरणाते तीन दरवाजे उघडल्याची माहिती मिळतंय. यंदाच्या जोरदार पावसामुळे पाणीटंचाईची समस्या दूर होणार हे नक्की आहे.