सर्वात मोठी बातमी ! भल्या पहाटेच ईडीचे अधिकारी आले, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा धाड; मुश्रीफ अडचणीत येणार?

संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर धाड पडली आहे. कोलकात्यातील बोगसकंपन्यांमधून 158 कोटी रुपये या कारखान्यात ट्रान्स्फर झाले होते.

सर्वात मोठी बातमी ! भल्या पहाटेच ईडीचे अधिकारी आले, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा धाड; मुश्रीफ अडचणीत येणार?
| Edited By: | Updated on: Mar 11, 2023 | 10:55 AM

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर पुन्हा एकदा ईडीची धाड पडली आहे. गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी धाड आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर ईडीने दुसऱ्यांदा धाड मारल्याने मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

आज पहाटेच ईडीच्या चार ते पाच अधिकाऱ्यांनी कागलमधील हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड मारली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी सकाळीच मुश्रीफ यांच्या घरी येऊन छाननी सुरू केली आहे. ईडीकडून महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. या कारवाईत कोणताही हस्तक्षेप होऊ नये म्हणून मुश्रीफ यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेल्या दीड महिन्यातील ईडीने ही दुसरी छापेमारी केल्याने मुश्रीफ यांना मोठा झटका बसला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

धाडीचं कारण काय?

संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर धाड पडली आहे. कोलकात्यातील बोगसकंपन्यांमधून 158 कोटी रुपये या कारखान्यात ट्रान्स्फर झाले होते. हा पैसा आला कुठून? ही कंपनी आहे कुठे? हा मनी लॉन्ड्रिंगचा पैसा आहे, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. तसेच या प्रकरणी मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर आयकर विभाग आणि ईडीने मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाईस सुरुवात केली होती.

कोण आहेत मुश्रीफ?

हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत. ते कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व करतात. राष्ट्रवादीचा बडा मुस्लिम चेहरा म्हणून मुश्रीफ यांची पश्चिम महाराष्ट्रात ओळख आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफ यांचा दबदबा आहे. आघाडी सरकारच्या काळात हसन मुश्रीफ यांची मंत्रिपदी वर्णी लागली होती. हसन मुश्रीफ यांनी कामगार मंत्रिपद सांभाळलंय. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही त्यांनी विजय मिळवला होता. त्यांना भाजपकडून पक्षात येण्याची ऑफरही देण्यात आली होती. पण त्यांनी ती ऑफर नाकारली होती.