AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात पावसाचे संकट, राज्य सरकारी कर्मचारी संपावर, पंचनामे कसे होणार

सरकारी कर्मचारी संपावर आहे. यामुळे अवकाळी पावसाचे पंचनामे रखडले आहे. शेतकरी वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. या अवघड परिस्थितीत सरकारची साथ शेतकऱ्यांना हवी होती.

राज्यात पावसाचे संकट, राज्य सरकारी कर्मचारी संपावर, पंचनामे कसे होणार
farmer Image Credit source: tv9 marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 15, 2023 | 9:30 AM
Share

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : राज्यात मागील आठवड्यात अवकाळी पाऊस झाला. आता पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात गहू, हरबरा पिके काही ठिकाणी काढली जात असताना हे संकट आले आहे. या अस्मानी संकटासोबत सुलतानी संकटही शेतकऱ्यांसमोर आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. यामुळे पंचनामे रखडले आहे.

नंदूरबार जिल्ह्यात आठवड्याभरात दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस झाला. सोमवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या अवकाळी पावसात शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालं आहे. एक आठवड्यात दोनदा अवकाळी पाऊस झाला असताना पहिल्या पावसाचे पंचनामे पूर्ण झाले नाही. त्याचवेळी दुसऱ्यांदा देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुसरीकडे महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी संपावर गेले आहेत.

शेतकरी वाऱ्यावर

सरकारी कर्मचारी संपावर आहे. यामुळे पंचनामे रखडले आहे. शेतकरी आता वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. या अवघड परिस्थितीत सरकारची साथ शेतकऱ्यांना हवी आहे. अवकाळी पावसामुळे किती नुकसान झाले याची माहिती पंचनामे झाल्यावरच मिळणार आहे. मात्र कर्मचारी संपामुळे पंचनामे कधी होणार असे काहीच प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे सरकारने यावर काहीतरी उपाय काढावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट

शेतकऱ्यांसमोर अवकाळीचे संकट आहे. यामुळे शेतकऱ्यांना आलेली आर्थिक अडचण आणि चाऱ्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांनी आता आपले गोधन बाजारात विकायला सुरुवात केली आहे. हातात पैसा नसल्याने शेतकऱ्यांनी सर्जा राजालाही विकायला काढला आहे. शेतकऱ्यांना आपली बैल जोडी विकावी लागत असल्याचे धुळे जिल्ह्यातील शेतकरी सांगतायेत.

परंतु बैल जोडीला योग्य किंमत मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी जेव्हा बैल जोडी घ्यायला जातो तेव्हा त्याला ती महाग दरात मिळते आणि जेव्हा तो बैल जोडी विकायला होतो तेव्हा ती स्वस्तात विकली जात असल्याची खंत शेतकऱ्यांची आहे. बैल जोडी सांभाळण्या इतपत आर्थिक खर्च पेलवणार नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आता बैल जोडी विकायला सुरुवात केल्याच शेतकरी सांगताय. अवकाळी पाऊस, घरात साठवून ठेवलेला कापूस आणि त्यातच चाऱ्याचा प्रश्न यामुळे शेतकऱ्यांना गोधन सांभाळणे आता अवघड ठरत आहे. त्यामुळे आठवडे बाजारांमध्ये आता गोधन विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात जनावर दाखल होत आहेत.

Follow Us
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही...
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही... संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेत हे काय सांगून टाकलं?
केबल चोराशी संजय दिना पाटलांचा संबंध? संदीप देशपांडेंनी फोटो दाखवून...
केबल चोराशी संजय दिना पाटलांचा संबंध? संदीप देशपांडेंनी फोटो दाखवून केली पोलखोल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन फिरवला अ्न... मुंबई लोकल हत्या प्रकरण
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन फिरवला अ्न... मुंबई लोकल हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे