AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अब्दुल सत्तार फसवत आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा…असा सल्ला कुणी आणि कुणाला दिला?

कृषीमंत्री जनतेची फसवणूक करत आहेत, शेतकऱ्यांनी पुढे यावं आणि फौजदारी गुन्हा दाखल करावा असा सल्ला देत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आंबेडकर यांनी टीका केली आहे.

अब्दुल सत्तार फसवत आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा...असा सल्ला कुणी आणि कुणाला दिला?
Image Credit source: Social Media
| Edited By: Kiran Balasaheb Tajne | Updated on: Oct 28, 2022 | 7:55 PM
Share

पुणे : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तारांवर शेतकऱ्यांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. राज्यातील शेतकरी वर्गाचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असतांना ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जोर धरत असतांना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही असे विधान केले होते. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी वर्गासह विरोधकांनी शिंदे सरकारच्या विरोधात रान पेटवले आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी थेट शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे. कृषीमंत्री शेतकऱ्यांची फसवणूक करत असून त्यांच्यावर शेतकऱ्यांनी गुन्हा दाखल करावा असे म्हणत हवामान विभागाकडून माहिती घ्या आणि ती माहिती मंत्र्यांना द्या, किती पाऊस पडला अतिवृष्टी झाली का ? याबाबत सविस्तर माहिती घेऊन शिंदे सरकारवर आंबेडकर यांनी निशाणा साधला आहे.

राज्यातील विविध भागात हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार अनेक ठिकाणी पाऊस अंदाजापेक्षा अधिक कोसळला आहे.

कृषीमंत्री जनतेची फसवणूक करत आहेत, शेतकऱ्यांनी पुढे यावं आणि फौजदारी गुन्हा दाखल करावा असा सल्ला देत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आंबेडकर यांनी टीका केली आहे.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे स्वतः राज्यातील विविध भागात पाहून शेतीचे किती नुकसान झाले आहे याची पाहणी करत आहे.

त्यानुसार अब्दुल सत्तार हे पाहणी करत असतांना ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती नाही असा दावा केल्याने रोष वाढवून घेतला होता.

एकूणच ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जोर धरत असतांना आंबेडकर यांनी शेतकऱ्यांना दिलेला चर्चेचा विषय ठरत आहे.

Follow Us
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी खाद्य तेलाबाबत घोषणा केलीच...
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी घोषणा केलीच...  खाद्य तेलाबाबत एफडीएकडून कडक नियमावली
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरेंवर
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरे गटावर निशाणा!
पोलिस संरक्षण काढून ये मग... फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर,
Video : पोलिस संरक्षण काढून ये मग...  फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कोर्टात काय...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कामत यांचा युक्तिवाद, ठाकरेंना जिंकून देणार?