AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

anna hazare | अण्णा हजारे पुन्हा सक्रीय, सरकार विरोधात आंदोलन पुकारले

anna hazare movement | राज्यात आरक्षणावरुन विविध समाजाचे आंदोलन सुरु आहे. मराठा, धनगर समाजाकडून गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. आता अण्णा हजारे पुन्हा सक्रीय झाले आहेत. त्यांनी 19 नोव्हेंबर रोजी राळेगणसिद्धीत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

anna hazare | अण्णा हजारे पुन्हा सक्रीय, सरकार विरोधात आंदोलन पुकारले
Anna HazareImage Credit source: tv9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 17, 2023 | 2:39 PM
Share

अभिजित पोते, पुणे | 17 नोव्हेंबर 2023 : राज्यात मराठा सामाजाने मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे राज्य सरकारही हादरले आहे. त्यानंतर ओबीसी आणि धनगर समाजाकडूनही आरक्षणासाठी आंदोलन केले जात आहेत. परंतु आपल्या आंदोलनामुळे राज्याला नव्हे तर केंद्र सरकारला हादरुन सोडणारे अण्णा हजार पुन्हा सक्रीय झाले आहे. अण्णा हजारे यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात अण्णा हजारे यांनी आंदोलन पुकारले आहे. 19 नोव्हेंबर रोजी राळेगणसिद्धीत अण्णा आंदोलन करणार आहेत. यामुळे पुन्हा राज्यात अण्णा हजारे यांचे आंदोलन राज्यात दीर्घ काळानंतर दिसणार आहे.

अण्णा हजारे यांनी कशासाठी पुकारले आंदोलन

अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीत पुन्हा आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 19 नोव्हेंबर रोजी राळेगणसिद्धीत अण्णा हजारे आंदोलन करणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा, देशातील सैनिकांचे भविष्य अधांतरी असू नये, यासह सैनिकांच्या मुलांना शिक्षण मोफत देण्यात यावे, या मागणीसाठी राज्यातील माजी सैनिक सरकार विरोधात आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व अण्णा हजारे करणार आहे. या आंदोलनामुळे देशभरातील सैनिक सरकार विरोधात राळेगणसिद्धीत एकटवणार आहे. त्यांना अण्णा हजारे मार्गदर्शन करणार आहे.

अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात केले आंदोलन

अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराचा निपटारा करण्यासाठी राज्यात आणि नवी दिल्लीत अनेक वेळोवेळी आंदोलने केली. अण्णा हजारे यांनी १९८० पासून १६ पेक्षा जास्त उपोषणे केली आहेत. अण्णांच्या आंदोलनानंतर सरकारला त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. अण्णा हजारे यांचे लोकपालसाठी झालेले आंदोलन लक्षवेधी ठरले होते. या आंदोलनामुळे सर्व देशाचे लक्ष अण्णा हजारे यांच्याकडे लागले होते. अण्णा हजारे यांनी ११६ दिवसापेक्षा जास्त दिवस उपोषण केले आहे. अण्णा यांच्या आंदोलनामुळे राज्यातील ४५० अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आणि ६ मंत्र्यांना आपले पद गमवावे लागले आहे. त्यात शिवसेना आणि भाजपचे मंत्रीसुद्धा होते.

Follow Us
'विलास घुले हत्या प्रकरणाशी कुटुंबाचा संबंध नाही'
विलास घुले हत्या प्रकरणाशी कुटुंबाचा संबंध नाही; बजरंग सोनवणे यांचा दावा, सीडीआर पुराव्यासाठी आव्हान
रिक्षाचालकांवरील मराठी सक्तीला राष्ट्रवादीचा विरोध
रिक्षाचालकांवरील मराठी सक्तीला राष्ट्रवादीचा विरोध; पारसनाथ तिवारी न्यायालयात जाणार.
झारखंड विद्यार्थी आंदोलनाचे यश. कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द
झारखंड विद्यार्थी आंदोलनाचे यश. कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द
तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
‘एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते’; हुसेन दलवाईंचा मोठा दावा
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा
मनोज जरांगेंना तीन दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
मनोज जरांगेंना डिस्चार्ज: मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीत २९ ऑगस्ट उपोषणाची तयारी
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला जामीन
नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद