Pune : थकबाकीमुळे पुण्यातल्या कोयाजी रोडवरच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित, ऐन पावसाळ्यात वाहनधारकांची गैरसोय

महाराष्ट्र राज्य वीज वितरण लिमिटेड कंपनीने थकबाकीचे कारण पुढे करून कोयाजी रोड, कॅम्प परिसरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. एकतर पावसाचे दिवस असून त्यात वीजपुरवठा खंडित केल्याने रात्रीच्या वेळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Pune : थकबाकीमुळे पुण्यातल्या कोयाजी रोडवरच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित, ऐन पावसाळ्यात वाहनधारकांची गैरसोय
कोयाजी रोडवरील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित
Image Credit source: Times
| Updated on: Aug 11, 2022 | 12:26 PM

पुणे : महाराष्ट्र राज्य वीज वितरण लिमिटेड (MSEDCL)ने कॅम्पमधील कोयाजी रोडवरील 300 मीटर पट्ट्यातील पथदिव्यांचा वीजपुरवठा आता महिनाभरासाठी बंद केला आहे. रोखीने अडचणीत असलेल्या पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे (Pune Cantonment Board) 6 लाखांहून अधिक थकबाकी आहे. या कारवाईमुळे मराठा वॉर मोमोरियल ते छावणी (Camp) पोलीस स्टेशन पर्यंतचा रस्ता अंधारात गेला आहे. तर गैरसोय होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने लोकांच्या सुरक्षेला महत्त्व द्यायला हवे होते. कॅन्टोन्मेंट आणि पुणे महानगरपालिका (पीएमसी) हद्दीत राहणारे बरेच लोक या रस्त्याचा वापर करतात, असे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. लष्करी अधिकारी, त्यांचे कुटुंबीय आणि संरक्षण क्षेत्रातील नागरिकांनीही कोयाजी रोड परिसर अंधारात गेल्याबाबत नाराजीचा सूर काढला असून तक्रारीदेखील केल्या आहेत.

‘…मात्र त्यांनी नकार दिला’

पीसीबीच्या एका वरिष्ठ अभियांत्रिकी विभाग अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, की MSEDCLने शिवाजी मार्केटला पुरवल्या जाणाऱ्या विजेवर व्यावसायिक दर लागू केले आणि त्या बिलात कोयाजी रोड स्ट्रीट लाइटची देयके विलीन केली. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ सुब्रत पाल म्हणाले, आम्ही महावितरणच्या उच्च अधिकाऱ्यांकडे बिलाचा मुद्दा पुन्हा मांडू. महावितरणच्या जेजे गार्डन विभागाच्या प्रभारी सहायक अभियंता वर्षा स्वामी म्हणाल्या, की आम्ही थकबाकी भरण्यात अयशस्वी झाल्यामुळे बिले इतर कनेक्शनमध्ये विलीन करू शकतो. आम्ही हप्तेही मागितले, पण त्यांनी नकार दिला.

नागरिकांची गैरसोय

महाराष्ट्र राज्य वीज वितरण लिमिटेड कंपनीने थकबाकीचे कारण पुढे करून कोयाजी रोड, कॅम्प परिसरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे या परिसरातीलच नव्हे तर या रस्त्याचा वापर करणाऱ्या पुणे परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. एकतर पावसाचे दिवस असून त्यात वीजपुरवठा खंडित केल्याने रात्रीच्या वेळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. छोटे मोठे अपघात वाढण्याची शक्यता आहे. शिवाय रस्त्यावर खड्डे असतील तर त्यात आणखी गैरसोय… त्यामुळे यावर लवकरात लवकर मार्ग काढावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.