ओमिक्रॉन रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही, आरोग्यतज्ज्ञ काय म्हणाले? वाचा सविस्तर

ओमिक्रॉनचा रुग्ण चांगला आहार आणि विश्रांती घेऊन बरा होऊ शकतो, त्यामुळे विशेष उपचार करण्याची गरज नसल्याचं मत आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवेंनी व्यक्त केलंय.

ओमिक्रॉन रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही, आरोग्यतज्ज्ञ काय म्हणाले? वाचा सविस्तर
Dr, avinash bhondve
| Edited By: | Updated on: Jan 05, 2022 | 6:41 PM

राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, देशानेही दोन हजरांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. नवीन आढळून येणाऱ्या कित्येक ओमिक्रॉन रुग्णांना सौम्य लक्षणं आढळून येत आहेत. त्यामुळे आशा रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज कितपत आहे? याबाबत आरोग्यतज्ज्ञांनी आपले मत व्यक्त केले आहे. ओमिक्रॉनच्या रग्णाला दवाखान्यात दाखल करण्याची गरज नाही. कारण याचा प्रसार फुफ्फुसापर्यंत जात नाही, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ओमिक्रॉनच्या रुग्णांनी काय खबरदारी घ्यावी?

ओमिक्रॉनच्या रुग्णांना घशातल्या घशात त्याचं इन्फेक्शन जाणवतं. मळमळणं उलटी झाल्यासारखे वाटणं अशी लक्षणं जाणवताता, मात्र याचा रुग्ण घरच्या घरी बरा होऊ शकतो, कारण याला विशेष औषधं लागत नाहीत. त्यामुळे तो रुग्ण चांगला आहार आणि विश्रांती घेऊन बरा होऊ शकतो, त्यामुळे विशेष उपचार करण्याची गरज नसल्याचं मत आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवेंनी व्यक्त केलंय.

राज्यातले निर्बंध आणखी कडक

13 ऑक्टोबरपासून राज्यात पुन्हा ऑफलाईन वर्ग सुरू झाले होते, मात्र पुन्हा ओमिक्रॉन आणि कोरोनाचा कहर वाढल्याने पुन्हा कॉलेज कॅम्पसमध्ये सन्नाटा पसणार आहे. कारण वसतिगृहे आणि कॉलेज पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. कोरोनाकाळात जसे ऑनलाईन शिक्षण सुरू होते तसे वर्ग सुरू राहणार आहेत. तसेच आगामी परीक्षाही ऑनलाईन होणार आहेत.

‘मुंबई-पुण्‍यातील विद्यापीठांचे जेएनयू करायचे आहे काय?’ आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारला सवाल

VIDEO: अब्दुल सत्तारांचं युतीबाबत मोठं विधान, देवेंद्र फडणवीस म्हणतात, नया है वह!

IND vs SA: बुमराह-जॅनसेन मैदानावरच भिडले, अंपायरला करावी लागली मध्यस्थी, काय आहे प्रकरण?