
उन्हाळा सुरु होताच शहारतील अनेक भागात पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. पुण्यातील दत्तनगर, भारतनगर, महादेव नगर आदी भागांत पाणी येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक होत रस्त्यावर उतरली होती.

दत्तनगर, भारतनगर, महादेव नगर यासह आसपासच्या परिसरात पाण्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. येथील नागरिकांना विशेषत: महिलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

महादेवनगरमधील पाण्याच्या टाकीजवळ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला कार्यकर्त्या हंडा घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. वेळेत पाणीपुरवठा केला गेला नाहीत तर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे

दत्तनगर, भारतनगर, महादेव नगर यासह आसपासच्या परिसरात पाण्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. येथील नागरिकांना विशेषत: महिलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

पाणीपुरवठा सुरळीत नाही. आधीच उन्हाळा, त्यात आता पाण्याची ही समस्या यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. लवकर समस्या न सोडवल्यास अधिक आक्रमक आंदोलन करणार असल्याचे आंदोलक म्हणाले आहेत.