Water cut : कमी पावसानंतर आता पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट! महापालिका लवकरच करणार घोषणा

| Updated on: Jul 01, 2022 | 3:21 PM

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांतून पुणे शहराला पाणीपुरवठा होतो. नुकतेच भामा आसखेड धरणातूनही पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस झाला असून त्यामुळे पाणीसाठ्यात घट झाली आहे.

Water cut : कमी पावसानंतर आता पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट! महापालिका लवकरच करणार घोषणा
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पुण्यात पुढील आठवड्यापासून पाणीकपात होणार आहे. पावसाची कमतरता आणि पुण्याला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमध्ये कमी पाणी असल्याने पुणे महानगरपालिका (PMC) पुढील आठवड्यापासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची घोषणा करण्याच्या तयारीत आहे. शहरात आणि परिसरात पावसाची कमतरता (Deficit rainfall) आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल आणि त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Commissioner Vikram Kumar) यांनी सांगितले आहे. धरणक्षेत्रात पावसाच्या कमतरतेमुळे पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता अशाप्रकारचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महापालिका सहसा 1,650 एमएलडी पाणी घेते.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांतून पुणे शहराला पाणीपुरवठा होतो. नुकतेच भामा आसखेड धरणातूनही पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस झाला असून त्यामुळे पाणीसाठ्यात घट झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 2.5 टीएमसी पाणीसाठा आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाने पीएमसीला पाणी काटकसरीने वापरण्यासाठी सतर्क केले आहे, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.

‘…तर संपूर्ण प्रणालीवरच परिणाम’

पर्यायी दिवसाचा पाणीपुरवठा अशाप्रकारे केला जाईल, की एका दिवसात फक्त 30 टक्के पाणीकपात केली जाईल. पुरवठा नेटवर्कमध्ये कोणतीही अडचण येणार नाही याची खात्री करण्यासाठी नागरी प्रशासनाने तांत्रिक बाबीदेखील लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्या योग्य प्रकारे न केल्यास पूर्ण प्रणालीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे आयुक्त म्हणाले.

हे सुद्धा वाचा

जलसंपदा विभागाने फटकारले

वाटप केलेल्या कोट्यापेक्षा जास्त पाणी उपसल्याबद्दल पुणे महापालिकेला राज्याच्या जलसंपदा विभागाने फटकारले असून यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहराच्या हद्दीत गावांचा समावेश झाला असून शहराची लोकसंख्या वाढली आहे, असे सांगत पुणे महापालिका पाण्याचा कोटा वाढविण्याची मागणी करत आहे. महापालिकेतर्फेही शहरात 24/7 पाणीपुरवठा प्रकल्प राबवला जात आहे आणि केंद्र सरकारने पुढील वर्षात काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.