AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Dam situation : पुण्यात अनेकठिकाणी पाणीटंचाई; पाणीपुरवठा विभागानं फोडलं रस्ता दुरूस्तीच्या कामांवर खापर!

पाटबंधारे विभाग पाणीटंचाई नाही, असे म्हणत असले तरी पुणे शहरातील अनेक नागरिक पाणीकपात आणि कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी करत आहेत. धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्याने असे होत नसल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.

Pune Dam situation : पुण्यात अनेकठिकाणी पाणीटंचाई; पाणीपुरवठा विभागानं फोडलं रस्ता दुरूस्तीच्या कामांवर खापर!
खडकवासला धरण (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: tv9
| Updated on: Apr 24, 2022 | 7:30 AM
Share

पुणे : पुण्याला पाणीपुरवठा (Water Supply) करणाऱ्या पानशेत, वरसगाव, खडकवासला, टेमघर या चार धरणांमधील साठा अजूनही 82 टक्क्यांच्या आसपास दिसत आहे. याचे कारण जलसंपदा विभाग डेटा अपडेट (Data update) करण्यात अपयशी ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून जलसंपदा विभाग आपल्या धरणातील पाणीसाठ्याची आकडेवारी अद्ययावत करत नाही, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील धरण (Dam) साठ्याबाबत कोणतीही स्पष्ट कल्पना येत नाही. दरम्यान, मान्सूनच्या आगमनानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेसा पाणीसाठा असल्याची खात्री असलेल्या पाटबंधारे विभागाकडून पाणीकपातीची मागणी नाही. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की सर्व धरणांमध्ये अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी पाणीसाठा कमी असला तरी शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागला नाही. यंदाही पाणीटंचाई भासणार नाही. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण होत आहे.

नागरिकांच्या तक्रारी

पाटबंधारे विभाग पाणीटंचाई नाही, असे म्हणत असले तरी पुणे शहरातील अनेक नागरिक पाणीकपात आणि कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी करत आहेत. धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्याने असे होत नसल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. शहराच्या अनेक भागात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे अनेक रहिवाशांना पाणीकपात किंवा कमी दाबाने पाणी मिळत आहे. दुरुस्तीचे काम असेल तरच पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

दुरुस्तीच्या कामामुळे काही ठिकाणी टंचाई

पीएमसीच्या जल विभागाच्या म्हणण्यानुसार, बहुतेक ठिकाणी वेळेवर पाणी येत असून पेठ भागात कमी दाबाने वाहणाऱ्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. काही ठिकाणी रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामामुळे हे घडले आहे. तर दुसरीकडे मात्र नागरिकांचे हाल सुरूच आहेत. त्यामुळे काही राजकीय पक्षदेखील यात उतरले. अनेक ठिकाणी मोर्चे तसेच आंदोलनेही होत आहेत. आता जूनपर्यंत पाणीपुरवठा विभाग याचे नियोजन कसे करतो, ते पाहावे लागेल.

आणखी वाचा :

बदली रोखण्यासाठी कृष्णप्रकाश यांच्या हालचाली? गोविंदबागेत जाऊन शरद पवारांची भेट, पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात चर्चा

Raosaheb Danve : राज्य सरकारच्या नियोजनाअभावी सहन करावी लागतेय कोळसाटंचाई; रावसाहेब दानवेंचा पुण्यात हल्लाबोल

Pune crime : पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं पुण्यातल्या बावधनमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नराधम रिक्षाचालक फरार

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.