Ankush Kakade | पुण्याचा पाणीप्रश्न तापला ; गिरीश बापट यांना आत्ताच पाण्याची टंचाई का जाणवू लागली – अंकुश काकडे

| Updated on: Mar 28, 2022 | 1:57 PM

आयुक्‍तांच्या बंगल्यावर जाऊन तेथे किती दाबाने पाणी येते, हे आम्ही पाहणार आहोत. पाणीपुरवठ्याबाबत आम्ही आज मुद्दे मांडले. त्यावेळी केवळ सुधारण करतो, असे उत्तर मिळते. मात्र जीव गेल्यावर सुधारण करणार का? तीन दिवसांत पाणीपुरवठा सुधारला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू

Ankush Kakade | पुण्याचा पाणीप्रश्न तापला ; गिरीश बापट यांना आत्ताच पाण्याची टंचाई का जाणवू लागली - अंकुश काकडे
गिरीश बापट यांना आत्ताच पाण्याची टंचाई का जाणवू लागली
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे – पाणी प्रश्नावरुन पुण्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat)हे कालवा समितीच्या बैठकीतून तावातावात बाहेर पडले होते. ‘आयुक्तांच्या घरी पाण्याचे प्रेशर चांगलं, पण त्यांना इतर प्रेशरच जास्त’ असा टोला गिरीश बापट यांची लगावला होता. यावरुन आता राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये (NCP and BJP) आरोप-प्रत्यारोप होत आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी गिरीश बापटांवर निशाणा साधला आहे. “गिरीश बापट यांना आत्ताच पाण्याची टंचाई का जाणवू लागली ” असा प्रश्न अंकुश काकडे(Ankush Kakade) यांनी उपस्थित केला आहे.

योग्य व्यवस्थापन करा

दुसरीकडं पुणे खडकवासला प्रकल्पात गतवर्षीपेक्षा 2.5 टीएमसी पाणी कमी आहे. त्यामुळे यंदा जलसंपदा, महानगरपालिका प्रशासनाने पाणीबचतीसाठी योग्य व्यवस्थापन करा. शहरात तसेच ग्रामीण भागातही कालव्यावर कोठे काही पाणीचोरी होत असेल, गळती होत असेल तर कठोर कारवाई करावी. सर्वांना समान न्यायाने पाणी मिळेल असे व्यवस्थापन करावे.अश्या सूचना उपमुख्यामंत्री तथा जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत .

गिरीश बापट यांचे आरोप

लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यामुळे प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे. काही अधिकारी पाणी सोडणाऱ्यांवर दबाव आणून पाणीपुरवठा कमी-अधिक प्रमाणात सोडत आहे. हे दबावतंत्र नक्की टॅंकर लॉबीसाठी, की अन्य कोणासाठी? आयुक्‍तांच्या बंगल्यावर जाऊन तेथे किती दाबाने पाणी येते, हे आम्ही पाहणार आहोत. पाणीपुरवठ्याबाबत आम्ही आज मुद्दे मांडले. त्यावेळी केवळ सुधारण करतो, असे उत्तर मिळते. मात्र जीव गेल्यावर सुधारण करणार का? तीन दिवसांत पाणीपुरवठा सुधारला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि त्याचे नेतृत्व मी करेन. असे गिरीश बापट, खासदार यांननी म्हटले होते.

Nashik | पोलीस आयुक्तावर दबाब आणणे अयोग्य, ट्रान्सफर होईपर्यंत आदेश मागे नाही; नववर्ष स्वागत समितीला पांडेय यांचे उत्तर

महाराष्ट्रात 2024 ला बहुमताचं सरकार येणार, Devendra Fadnavis यांचा गोव्यातून मविआला इशारा

VIDEO: धर्मेंद्र प्रधान यांच्या स्वप्नातली रिफायनरी Nanarमध्ये नक्कीच होणार नाही: विनायक राऊत