Rupali Patil : मोहित कंबोज कुठल्या आधारावर बोलला, याची चौकशी करणार आहात का? रुपाली पाटलांचा शिंदे-फडणवीसांना सवाल

| Updated on: Aug 17, 2022 | 5:01 PM

भाजपाचे नेत्यांनी हा जो पोरखेळ लावला आहे तो बंद करावा, अन्यथा याचे वाईट परिणाम होतील, असा इशारादेखील राज्य सरकारला रूपाली ठोंबरे पाटील यांनी दिला आहे.

Rupali Patil : मोहित कंबोज कुठल्या आधारावर बोलला, याची चौकशी करणार आहात का? रुपाली पाटलांचा शिंदे-फडणवीसांना सवाल
भाजपावर टीका करताना रुपाली पाटील
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : मोहित कंबोज (Mohit Kamboj) हा परप्रांतीय असून तो आमच्या राज्यात येऊन सातत्याने विरोधकांना धमक्या देत आहे. पण आम्ही लक्ष देत नाही. कारण असे फालतू मोहित कंबोज वारंवार भुंकताना दिसत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Patil) यांनी केली आहे. मोहित कंबोज यांनी काल ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक नेता अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटायला तुरुंगात जाईल, असे विधान केले होते. त्यानंतर राज्यातले राजकारण (Politics) अधिकच तापताना पाहायला मिळत आहे. त्याचवरून मोहित कंबोज यांच्यावर टीका करताना रूपाली ठोंबरे पाटील यांनी राज्य सरकारलादेखील घेरले आहे. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

‘सत्तेसाठी भाजपाचा पोरखेळ’

भाजपाचे नेत्यांनी हा जो पोरखेळ लावला आहे तो बंद करावा, अन्यथा याचे वाईट परिणाम होतील, असा इशारादेखील राज्य सरकारला रूपाली ठोंबरे पाटील यांनी दिला आहे. भाजपाचा कुठलाही नेता उठतो आणि म्हणतो, हा नेता आत जाणार, याच्यावर कारवाई होणार. याला कोणताही कायदेशीर थारा नाही. भाजपाच्या नेत्यांकडून ईडी, सीबीआयचा गैरवापर करून ज्याला क्लिनचीट दिली असेल, तुमच्या काळात दिली गेली असेल तरी पुन्हा चौकशी करायला लावणे हा पोरखेळ आहे. हा पोरखेळ तुम्ही थांबवणार आहात का, असा सवाल त्यांनी भाजपाला केला आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाल्या रुपाली ठोंबरे?

‘विरोधकांवर खोटे आरोप’

जेलमध्ये जायला कोणी घाबरत नाही. मात्र तुम्ही पारंपरिकतेला छेद देत आहात. विरोधकांवर खोटे आरोप करायचे. विशेष म्हणजे अधिवेशनाच्या तोंडावर असे ट्विट सोडून विरोधकांना धाकात ठेवायचे, असा जो प्रकार मोहित कंबोज करत आहे, त्याला आमचा ठाम विरोध आहे. एखादा परप्रांतीय तो जेथून आला आहे, तेथे जाऊन या यंत्रणांचा गैरवापर करून सत्ता बदलावी, येथे का, असा संतप्त सवाल रुपाली ठोंबरे यांनी केला आहे. तसेच ही मुस्कटदाबी सहन करणार नाही, असेही त्या म्हणाल्या.