‘उद्धव ठाकरेंना ‘बारामतीची हवा’ जास्तच मानवलेय; अजितदादा मराठ्यांचा घात करु नका’

| Updated on: May 12, 2021 | 8:25 AM

पुन्हा एकदा मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचा कार्यक्रम सुरु झाला आहे. त्या विकल्पाकडे ठरवून दुर्लक्ष करून केंद्राकडे बोटं दाखवून | Maratha Reservation

उद्धव ठाकरेंना बारामतीची हवा जास्तच मानवलेय; अजितदादा मराठ्यांचा घात करु नका
Follow us on

पुणे: अजित पवार यांनी तीन महिन्यांपूर्वी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या पर्यायाविषयी सूतोवाच केले होते. मात्र, आता हा पर्याय पूर्णपणे बाजूला सारण्यात आला आहे. तेव्हा अजित पवार (Ajit Pawar) यांनी मराठ्यांचा घात करु नये, असे वक्तव्य संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी केले. (Sambhaji brigade reaction on maratha reservation)

ते मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री महोदयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहल्याची बातमी आली. पुन्हा एकदा मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचा कार्यक्रम सुरु झाला आहे. माननीय गायकवाड आयोग स्वीकारुन सरसकट ओबीसी समावेश जे पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत आहे त्या विकल्पाकडे ठरवून दुर्लक्ष करून केंद्राकडे बोटं दाखवून हात झटकण्याचा घृणास्पद प्रकार मुख्यमंत्री करत आहेत. ज्या व्यक्तीने कधीही शब्द बदलला नाही अशा बाळासाहेबांचे ते वारस आहेत, परंतु सध्या बारामतीची हवा त्यांना जरा जास्तच मानवलेली दिसतेय, गोड बोलणे आणि पाठीत सुरी घोपासने, अशी टीका सौरभ खेडेकर यांनी केली.

मुख्यमंत्री आणि राज्यपालांची भेट?

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.

गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, त्याबाबतच राज्यपालांना भेटलो. निकालामध्ये म्हटलंय आरक्षणाचा अधिकार राज्याचा नाही तर केंद्राचा आहे. त्यामुळे आम्ही केंद्राला आणि राष्ट्रपतींना आमच्या भावना कळवण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. त्यावेळी राज्यपालांनी आपल्या भावना केंद्रापर्यंत पोहोचू, असं सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. फडणवीसांचा कायदा फुलप्रूप असता, तर आज राज्यपालांना भेटायला यावं लागलं नसतं. आज आम्ही पत्र दिलं आहे, त्याचं उत्तर काय येतं ते पाहू. त्याची प्रतीक्षा जनतेला आहे. राज्यपालही सहमत आहेत. त्यांनी पत्र वेळेत पोहोचवण्याचं आश्वासन दिल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या:

तेव्हा श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा ‘फुलप्रूफ’ नव्हता!, फडणवीसांचा पलटवार

मराठा आरक्षणाचा पोपट मेलाय, हे राज्यकर्ते सांगून का टाकत नाहीत; ब्राह्मण महासंघाचं वक्तव्य

‘जायचंय पंढरपूरला पण गाडी निघाली गोव्याला’, मराठा आरक्षणावरुन भाजपचा ठाकरे सरकारला टोला

(Sambhaji brigade reaction on maratha reservation)