Sanjay Raut: इच्छा नसताना रोज सकाळी मी बोलतो, राऊत असं का म्हणाले?

| Updated on: May 08, 2022 | 3:54 PM

समोरच्या लोकांची ताकद आणि त्यांच्या भूमिका त्यानुसार आपल्या लोकांना तयार करावं लागेल. सैन्य पोटावर चालतो. शिवसेनाप्रमुखांच्या काळात एक पिढी वडापाव खाऊन युद्ध करत होती. आता युद्ध वडापाववर होणार नाही. आता आपल्याला महाराष्ट्रात सत्ता आहे. महाराष्ट्र सरकार आपल्या हातात, असे म्हणत राऊतांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

Sanjay Raut: इच्छा नसताना रोज सकाळी मी बोलतो, राऊत असं का म्हणाले?
इच्छा नसताना रोज सकाळी मी बोलतो, राऊत असं का म्हणाले?
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : शिवसेनेच्या भात्यातला सर्वात तीक्ष्ण बाण म्हणून शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ओळखलं जातं. सामनातून आपल्या लेखातून आणि रोज माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेतून राऊत नेहमीच भाजपवर तुटून पडतात. आज पुन्हा तेच दिसून आलं आहे. संजय राऊतांनी आज पुन्हा चौफेर बॅटिंग करत भाजपवर (BJP) सडकडून टीका केली आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकातही भाजप नेत्यांनी सोशल मीडियाचं ट्रेनिंग दिलं. हिजाबपासून अनेक मुद्दे त्यांनी प्रचारात आणले. त्या मानाने आपली टीम लहान आहे. परत सांगतो. हे युद्ध आहे. हे राज्य टिकवायचं असेल या प्रवृत्ती विरुद्ध लढायचं असेल तर समोरच्या लोकांची ताकद आणि त्यांच्या भूमिका त्यानुसार आपल्या लोकांना तयार करावं लागेल. सैन्य पोटावर चालतो. शिवसेनाप्रमुखांच्या काळात एक पिढी वडापाव खाऊन युद्ध करत होती. आता युद्ध वडापाववर होणार नाही. आता आपल्याला महाराष्ट्रात सत्ता आहे. महाराष्ट्र सरकार आपल्या हातात, असे म्हणत राऊतांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

इच्छा नसताना मी बोलतो

तसेच हे राज्य आपण भाजपकडून खेचून घेतलं आहे. आपल्यावरील हल्ले परतवायचे असेल तर संजय राऊत आणि अरविंद सावंत असून उपयोगी नाही. हजारो लोक पाहिजे. रोज उठलं पाहिजे हल्ला केला पाहिजे. बेडरपणे हल्ला केला पाहिजे आणि परिणामांची पर्वा न करता. मी रोज सकाळी बोलतो माझा नाईलाज आहे. मी नाही बोललो सकाळी तर दिवसभर पक्षाचा कार्यक्रम सेट होणार नाही. दूरदर्शनवर सोशल मीडियावर सातत्याने शिवसेना शिवसेना येण्यासाठी मी इच्छा नसतानाही रोज सकाळी बोलतो. मी जर बोललो नाही तर दिवसभरात सोशल मीडियावर शिवसेना दिसणार नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियात शिवसेना दिसणार नाही, असेही राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

आपण नैतिकता संभाळात बसलोय

तर शिवसनेच्या नत्यांना उद्देशून बोलताना संजय राऊत म्हणाले. वरुण सरदेसाई तुम्ही आज गालातल्या गालात हसतात पण तुम्हाला याच मार्गाने जावं लागेल. आपल्या देशात विरोधकांना बदनाम करण्याची मोहीम सुरू झाली. काँग्रेस ते शिवसेनेची बदनामी होत आहे. ही गोबेल्स निती आहे. आपण या नीतीपासून दूर राहतो. पण त्याच माध्यमातून आपली बदनामी झाली आपण फक्त नैतिकता सांभाळत बसलोय, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले. येत्या काही दिवसात राज्यात बडा महापालिकांच्या तसेच इतर निवडणुका पार पडत आहे. त्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊतांनी सभांचा सपाटा लावला आहे. येत्या निवडणुकीसाठी सेनेने जोरदार कंबर कसली आहे. भाजपचेही बडे नेते मैदानात उतरले आहेत. त्यामुळे हा संघर्ष आता वाढताना दिसून येत आहे.