AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात नोव्हेंबर महिन्यात का पडत आहे पाऊस? शेतकऱ्यांसाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

unseasonal rain in maharashtra | राज्यात दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. या पावसामुळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. राज्यात सर्वच भागांत या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. राज्यात नोव्हेंबर महिन्यात का पाऊस पडत आहे? हवामान तज्ज्ञ डॉक्टर रंजन केळकर यांनी माहिती दिली.

राज्यात नोव्हेंबर महिन्यात का पडत आहे पाऊस? शेतकऱ्यांसाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला
महाराष्ट्रात दोन दिवसांपासून गारपीटसह अवकाळी पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट उभे राहिले आहे. नाशिकच्या द्राक्ष पंढरीत गारपिटीमुळे द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले. डाळिंब बाग आणि कांदा पीकाचे नुकसान झाले आहे.
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 28, 2023 | 11:13 AM
Share

पुणे, दि. 28 नोव्हेंबर 2023 | राज्यात गेल्या दोन, तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. पाऊस आणि गारपीटमुळे शेत पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यांत का पाऊस पडत आहे? हा प्रश्न शेतकऱ्यांप्रमाणे सर्वसामान्यांनाही पडला आहे. गेल्या काही वर्षांपासून हिवाळ्यात पाऊस पडण्याचा घटना वाढत आहे. त्याला कारण पश्चिम आणि पूर्वेकडील वारे आहेत. दोन्ही वारे महाराष्ट्रात भिडत आहेत. यामुळे हिवाळ्यात गारपीट आणि पाऊस पडत आहे, असे हवामान तज्ज्ञ आणि भारतीय हवामान विभागाचे माजी महासंचालक डॉक्टर रंजन केळकर यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांनी करावा हा बदल

नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडत आहे. पावसाचे प्रमाण ओळखून शेतकऱ्यांनी पिके घ्यावीत. या पावसाला अवकाळी म्हणता येईल. पुणे जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात ३० मिमी पावसाची नोंद गेल्या काही वर्षांत झाली आहे. भारतात गारा पडण्याच्या घटना वारंवार घडत नाहीत उत्तर भारतात हिवाळ्यात हिमवृष्टी होते. परंतु हिवाळ्यात गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. नोव्हेंबरमध्ये असे वातावरण नेहमीच असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कधी कोणते हवामान असते, हे ओळखून पिके घ्यावीत.

परस्परविरोधी प्रवाह भिडल्यास पाऊस

भारत उष्ण कटीबंधीय देश आहे. उष्ण कंटीबंधाचे वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. शीत कटीबंधाचे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. एकीकडे शीत व शुष्क हवा तर दुसरीकडे उष्ण आणि दमट हवा यांची देवाणघेवाण होते. यामुळे वादळी पावसासह गारपीट होते.

राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत पाऊस

राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरु राहणार आहे. यामुळे आणखी पिकांना फटका बसू शकतो. अवकाळी पावसाचा शेतीला मोठा फटका बसला आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तक्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे गुजरातमध्ये अनेक भागांत अवकाळी पाऊस सुरु आहे. या पावसामुळे राज्याच्या विविध भागांत वीज पडून २० जणांचा मृत्यू झाला आहे.

Follow Us
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल... दिल्लीत हालचाली वाढल्या!
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर...
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबच्या भेटीची इनसाइड स्टोरी समोर, नेमकं काय ठरलं?