Rajyasabha Election : राज्यसभेसाठी महाराष्ट्रात कांटे की टक्कर, मविआसाठी रस्ता सोपा नाही, जाणून घ्या राजकीय गणित

Rajyasabha Election : महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होत आहेत. यात महायुती 4 ते 5 जागा निवडून आणण्याच्या स्थितीमध्ये आहे. मविआ 2 जागांवर दावा करु शकते. पण तीन पक्षांना प्रत्येकी एक जागा हवी आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने आपल्या ताकदीपेक्षा अधिक उमेदवार उतरवले तर क्रॉस वोटिंगची भिती आहे.

Rajyasabha Election : राज्यसभेसाठी महाराष्ट्रात कांटे की टक्कर, मविआसाठी रस्ता सोपा नाही, जाणून घ्या राजकीय गणित
rajyasabha election
| Updated on: Feb 20, 2026 | 1:03 PM

राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. सर्वात जास्त 7 जागा महाराष्ट्रात रिक्त होणार आहेत. इथल्या निवडणुकांवर सगळ्यांची नजर आहे. महाराष्ट्रातील राज्यसभा खासदार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशिवाय विरोधी पक्षातील शरद पवार आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यासारखे नेते रिटायर होणार आहेत. यावेळी महाराष्ट्रातील संख्याबळाचं समीकरण असं आहे की, विरोधी पक्षाच्या नेत्यांना विजय मिळवण्यासाठी कठोर मेहनत करावी लागेल.

महाराष्ट्रात सात जागा रिक्त होणार आहेत. वर्तमान संख्याबळानुसार 7 पैकी 5 जागांवर सत्ताधारी महायुती आघाडीची बाजू वरचढ आहे. उरलेल्या दोन जागांसाठी विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत जोरदार चुरस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार यांना पुन्हा राज्यसभा खासदार बनायचं आहे. शिवसेना यूबीटी आणि काँग्रेस आपपाल्या बाजूने जोर लावतायत.

26 फेब्रुवारीला अधिसूचना

एप्रिल महिन्यात 37 राज्यसभा खासदार रिटायर होणार आहेत. ते गेल्यानंतर रिक्त होणाऱ्या पदांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. 10 राज्यात 37 जागांसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. त्याचदिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी होईल. निवडणुकी संदर्भात 26 फेब्रुवारीला अधिसूचना जारी होईल.

जास्त जागा निवडून येणं स्वाभाविक

राज्यसभा निवडणुकीत जनतेचा थेट सहभाग नसतो. पण याचं राजकीय महत्व मोठं आहे. कारण राज्यसभा सदस्यांची निवड संबंधित राज्यातील विधानसभेचे आमदार करतात. महाराष्ट्राच्या राजकारणात विद्यमान विधानसभेची समीकरणं पाहिली तर महायुती आघाडीच्या जास्त जागा निवडून येणं स्वाभाविक आहे. पण अतिरिक्त उमेदवार उतरवले तर क्रॉस वोटिंगची सुद्धा शक्यता आहे. विरोधी पक्ष एखादा उमेदवार जास्त उतरवून निवडणूक रंगतदार करु शकतात.

एका उमेदवाराच्या विजयासाठी आवश्यक मतांची संख्या किती?

राज्यसभा निवडणुकीत एका उमेदवाराच्या विजयासाठी आवश्यक मतांची संख्या एकूण वैध मतांच्या आधारावर ठरते. सामान्यत: महाराष्ट्रात एकाजागेसाठी जवळपास 38 ते 42 मतांची गरज पडते. महाराष्ट्रात दोन सभागृह आहेत. विधानसभा आणि विधान परिषद. विधान परिषदेत 78 सदस्य आहेत. विद्यमान राजकीय समीकरणांनुसार दोन्ही सभागृहात सर्व पक्षांची स्थिती अशी आहे. 288 सदस्यांच्या विधानसभेत भाजपचे 132 आमदार आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे 57 आणि एनसीपी अजित पवार गटाचे 41 आमदार आहेत. महायुतीचा एकूण आकडा 220 च्या आसपास आहे. विरोधी पक्षात असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 20 आमदार आहेत. काँग्रेसचे 16 आणि एनसीपी शरद पवार गटाचे 10 आमदार आहेत. महाविकास आघाडीचा आकडा 45-50 च्या आसपास आहे. त्याशिवाय काही छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार आहेत.

आता रिटायर होणारे खासदार कोण?

आता जे खासदार रिटायर होणार आहेत, त्यात भागवत कराड, धैर्यशील मोहन पाटिल, रजनी अशोक राव पाटिल त्या शिवाय काँग्रेसकडून डॉ. फौज़िया ताहसीन अहमद खान यांचं नाव आहे. शिवसेना यूबीटीकडून प्रियंका चतुर्वेदी, एनसीपीकडून शरद पवार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची नावं आहेत.

रामदास आठवले आता केंद्रीय मंत्री आहेत. त्यांना काहीही करुन महायुतीत राज्यसभेची सीट हवी आहे. रजनी पाटील आणि धैर्यशील पाटील यांना राज्यसभा खासदार बनायचं आहे. भाजपं काही नवीन चेहऱ्यांना संधी देऊ शकते. विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीकडून प्रियंका चतुर्वेदी आणि एनसीपी नेते शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेवर जायचं आहे. काँग्रेसला सुद्धा संख्याबळाच्या आधारावर राज्यसभेची जागा हवी आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज्यसभेची एक जागा हवीय. एकूणच बदललेल्या राजकीय समीकरणात जोडं-तोड आणि चर्चांचा बाजार गरम आहे.