Jitendra Awhad : ‘तुम्ही ज्या घोड्यावर बसलात, तो त्या घोड्याचाही अपमान आहे, कारण..’ जितेंद्र आव्हाडांवर जिव्हारी लागणारी टीका

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांनी काल ठाण्यात घोड्यावर बसून आंदोलन केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. आता राज्यातील एका शेतकरी नेत्याने आव्हाड यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे.

Jitendra Awhad : तुम्ही ज्या घोड्यावर बसलात, तो त्या घोड्याचाही अपमान आहे, कारण.. जितेंद्र आव्हाडांवर जिव्हारी लागणारी टीका
Jitendra Awhad
| Updated on: May 13, 2026 | 12:43 PM

मध्य पूर्वेतील युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला काही महत्वाची आवाहनं केली आहेत. त्यात दोन मुख्य आवाहनं आहेत ती म्हणजे वर्ष भर सोनं खरेदी न करणं आणि दुसरं पेट्रोल-डिझेल बचतीच. कारण या दोन्ही गोष्टींच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च होतं. सध्या डॉलरचा रेट 100 च्या आसपास आहे. त्यामुळे दररोज रुपया कोसळत आहे. देशाच्या तिजोरीवर आणि अर्थव्यवस्थेवर याचा भार येत आहे. म्हणून मोदींनी देशातील जनतेला काही आवाहनं केली आहेत. पण विरोधी पक्षांनी लगेच यावरुन मोदी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक धोरणांवर टीका केली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यापुढे जात चक्क घोड्यावर बसून आंदोलन केलं.

यावेळी बोलताना आमदार आव्हाड यांनी म्हणाले की, “अख्या देशाला संदेश आहे. या देशाची पातळी कुठे आणून ठेवली मोदी साहेबांनी. बंगालचे इलेक्शन होईपर्यंत चूप बसले आणि त्यानंतर हे सगळं नाटक सुरू झालेलं आहे” “स्वत: परदेशी फिरायचं मात्र इथे लोक उपाशी आहेत. एक प्रसिद्ध म्हण आहे, ‘वारे मोदी तेरा खेल… सस्ती दारू महंगा तेल’. तेलाचे भाव गगनाला गेले आहेत. काही फरक पडत नाही. एका-एका मंत्र्यांच्या मागे सात सात गाड्या फिरत आहेत. सगळा तमाशा करून टाकला आहे या देशाचा. देशाची परिस्थिती गेल्या दोन वर्षांपासून अशीच आहे. हे अजून याच्यापेक्षा खाली जाणार आहे. परिस्थिती सुधारणार नाही. महागाई आणखी वाढणार आहे” असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.

मोदींचे आव्हान तुम्हाला काय कळणार ?

आमदार जितेंद्र आव्हाड, ठाणे शहराध्यक्ष मनोज प्रधान सह इतर पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कार्यालयापासून थेट ठाणे महानगरपालिका मुख्यालयापर्यंत बैलगाड्या, घोडागाडी घेऊन आंदोलन केलं. आता शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या घोडागाडी आंदोलनावर टीका केली आहे. ते आव्हाडांना जिव्हारी लागणारं बोलले आहेत. “मोदींचे आव्हान तुम्हाला काय कळणार ?. “गधा क्या जाने गुड क्या चीज होती है?” अशा शब्दात त्यांनी आव्हाडांवर टीका केली.

Follow Us