Raj Thackeray : खासदार ब्रिजभूषण यांच्या आरोपानंतरही धडाडणारे राज मौनात; अयोध्या दौऱ्याआधीच्या मौनात दडलंय काय?

| Updated on: May 15, 2022 | 9:54 PM

मनसे अध्यक्षांच्या निकटवर्तीयांना वाटते की, राज ठाकरे हे भाजपच्या जाळ्यात अडकले जात आहेत. आणि या सापळ्यातून बाहेर पडून राज ठाकरे यांनी आपल्यात कोणतेही चक्रव्यूह मोडण्याची क्षमता असल्याचे सिद्ध केले पाहिजे.

Raj Thackeray : खासदार ब्रिजभूषण यांच्या आरोपानंतरही धडाडणारे राज मौनात; अयोध्या दौऱ्याआधीच्या मौनात दडलंय काय?
मनसे प्रमुख राज ठाकरे
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : देशात हनुमान चालिसाचे राजकारण चांगलेच तापलेले असताना राज यांच्यावर उत्तर भारतीयांच्या आस्मिताचा मुद्दा उपस्थित करत भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (MP Brijbhushan Sharan Singh) यांनी रान उठवून दिले आहे. तर त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याला (Ayodhya tour) विरोध केला आहे. तसेच त्यांनी जोपर्यंत राज ठाकरे हे उत्तर भारतीय जनतेची माफी मागत नाही तोपर्यंत ते राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांना आयोध्येत पाय ठेऊ देणार नाही अशी भीमगर्जना केली आहे. त्यामुळे राज्यात आणि उत्तर प्रदेशचे राजकारण चांगलेच गरम झाले आहे. तर आयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध करूनही शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांच्यासारखे स्पष्टवक्ते शैलीत बोलणारे राज ठाकरे गप्प का? त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना आणि प्रवक्त्यांना संयम बाळगून मौन बाळगण्याचे निर्देश का दिले आहेत? असे अनेक प्रश्न राज्यातील आणि देशातील जनतेला पडलेला आहे. याशिवाय मनसे आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुढे जात आहे. मात्र त्यांना आता शिवसेनेप्रमाणे ‘मराठी माणूस’या जुन्या मुद्द्यावरून बाजूला होत देशव्यापी विचार करावा लागणार आहे. राज ठाकरे यांच्या आतापर्यंतच्या मौनामागील कारण म्हणजे त्यांचे महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी असलेले घट्ट नाते मानले जात आहे.

सल्लागार राज यांना निर्णय बदलण्यास सांगतात

महाराष्ट्रातील 14 महापालिकांच्या निवडणुकीतील वातावरण बिघडू नये, यासाठी महाराष्ट्र भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी पडद्याआडून राज ठाकरेंना उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावर शांतता आणि संयम बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधाला न जुमानता, मनसेचे नेते, कार्यकर्ते आणि खुद्द राज ठाकरे अद्यापही अयोध्येला जाण्यावर ठाम असताना, त्यांच्या राजकीय सल्लागारांनी त्यांना अयोध्या दौऱ्याची तारीख बदलण्याच्या पर्यायाचा विचार करावा, असा सल्ला दिला आहे.

ठाकरे स्टाईलमध्ये प्रत्युत्तर देण्यासाठी दबाव

मनसे अध्यक्षांनी आपली फायरब्रँड नेता प्रतिमा कायम ठेवावी, असे सल्लागारांचे म्हणणे आहे. यासाठी भाजप खासदार ब्रिजभूषण यांना ‘ठाकरे स्टाईल’मध्ये उत्तर देणे अत्यंत गरजेचे आहे. तिथल्या एका साधू-महंताशी संपर्क साधून त्यांच्या निमंत्रणावरून आयोध्येला जाऊन रामललाचे दर्शन घेण्यापेक्षा स्वतः आयोध्येला जाणे चांगले. राज ठाकरेंनी आयोध्या दौऱ्याची तारीख बदलली तर भाजप खासदाराने एका ‘मराठी भाषिक नेत्याला’ अयोध्या दौऱ्यापासून रोखल्याचा संदेश देशभर जाईल असेही म्हटले जात आहे. तसे झाले तर मराठी माणसांची राज ठाकरेंबद्दलची भावना आणि सहानुभूती महाराष्ट्रात वाढेल असेही वाटत नाही.

हे सुद्धा वाचा

भाजप आपल्या जाळ्यात अडकवत तर नाही ना

त्यांचे सल्लागार देखील तारीख बदलण्याचा सल्ला देत आहेत कारण हे सर्व उघडपणे असूनही, गृहमंत्री अमित शहा किंवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना रोखण्याचा इशारा दिलेला नाही. मनसे अध्यक्षांच्या निकटवर्तीयांना वाटते की, राज ठाकरे हे भाजपच्या जाळ्यात अडकले जात आहेत. आणि या सापळ्यातून बाहेर पडून राज ठाकरे यांनी आपल्यात कोणतेही चक्रव्यूह मोडण्याची क्षमता असल्याचे सिद्ध केले पाहिजे.

राज ठाकरेंनी माफी मागावी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिमा आक्रमक नेत्याची आहे. असे असतानाही भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी त्यांच्या आयोध्या दौऱ्याचा तीव्र शब्दांत विरोध सुरू केले आहे. ते गरळ ओकतच आहेत. मात्र राज हे गप्प राहिले. त्याचा परिणाम असा झाला आहे की, खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी तर राज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हटलं आहे. तसेच उत्तर प्रदेश, साधू समाज किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागावी असा सल्लाही दिला आहे. एवढेच नाही तर उत्तर भारतीयांची माफी न मागता राज ठाकरे आयोध्येत आले तर त्यांना ‘छठी का दूध’ची आठवण करून दिली जाईल, अशी धमकीही भाजप खासदार ब्रिजभूषण यांनी दिली आहे.

निरुपम म्हणाले – राज यांनी माफी मागावी

अयोध्येत जिथे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी ‘राज ठाकरे माफी मांगो’ असा मुद्दा तापवला असतानाच मुंबईत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी देखील यात उडी घेतली आहे. तसेच त्यांनी राज ठाकरे यांचा हा मुद्दा उपस्थित केला आहे. प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाण्याची घोषणा राज ठाकरेंनी केली होती, तेव्हा मनसे अध्यक्षांनी आयोध्येत जाण्यात काही अडचण नसल्याचे सर्वप्रथम निरुपम यांनी म्हटलं होतं. पण तिथे जाण्यापूर्वी त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, कारण 2008-09 मध्ये मनसे नेते आणि कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारे उत्तर भारतीयांना मारहाण केली, ती जखम अजून भरलेली नसल्याचेही त्यांनी म्हटलं होतं.

भाजपकडूनही माफी मागण्याची विनंती

मुंबई भाजपचे प्रवक्ते ठाकूर संजय सिंह यांनीही राज ठाकरेंना पत्र लिहून माफी मागण्याचा सल्ला दिला आहे. कायदेशीर बाबींमधील तज्ज्ञ आणि लखनऊचे भाजप आमदार राजेश्वर सिंह यांची बहीण आभा सिंह याही संजय निरुपम यांच्या म्हणण्याशी सहमत असल्याचे म्हटलं आहे. तसेच मनसे अध्यक्षांनी आधी मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि नंतर आयोध्या दर्शनाला जावे, असे त्यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस स्वतः काशीला गेले

गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई महापालिका निवडणूक हा नाकाचा प्रश्न बनवला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीही विशेषत: मुंबईतील 14 नगरपालिकांची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. अशा स्थितीत जोपर्यंत भाजप मराठी मतदारांना मोठ्या प्रमाणावर सोबत घेऊन चालणार नाही तोपर्यंत निवडणूक जिंकणे अवघड आहे. भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणाच्या अनेक फेऱ्यांमध्ये ही बाब समोर आली आहे. त्यामुळेच मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत घेण्याची रणनीती भाजपकडून आखली जात आहे.

त्यामुळेच हिंदुत्वाचा मुद्दा

भाजप सध्या राष्ट्रीय पातळीवर हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारण करत आहे. त्यामुळे राज ठाकरेंनाही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुढे जाण्याचा सल्ला भाजपकडून देण्यात आला आहे. कारण उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्यामुळे महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या पक्षाची पोकळी निर्माण झाली आहे. पूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा काशी विश्वनाथ येथे प्रार्थना करण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांनी मोठ्या संख्येने ठाकूर समाजाच्या नेत्यांची भेट घेतली होती. त्याचवेळी हलक्या आवाजात खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांची भूमिका नरमवण्याचा संदेश दिला होता.

राजचा वाद अमित शहांच्या कोर्टात

राजकीय जाणकारांच्या मते ब्रिजभूषण शरण सिंह हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या छावणीतील नाहीत. त्यामुळेच आतापर्यंत मुख्यमंत्री योगी यांनी या मुद्द्यावर मध्यममार्ग काढलेला नाही. तर फडणवीस यांच्या यूपी दौऱ्यानंतरही खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांची वृत्ती नरमलेली नाही. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांच्या कोर्टात जाण्याची शक्यता आहे. तर लवकरच हा प्रश्न सोडविला जाईल असेही म्हटले जात आहे.