
बोरीबंदर स्थानक ते ठाणे दरम्यान आशियातील पहिली प्रवासी रेल्वे धावली होती. येत्या 16 एप्रिलला या घटनेला तब्बल 171 वर्षे पूर्ण होतील. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर अनेक स्थानके कालानुरुप अस्तित्वात आली तर काही स्थानके काळाच्या उदरात गडप झालीत. मुंबईत ब्रिटीशकाळात कार्यरत असलेली चार स्थानके आज अस्तित्वात नाहीत. या स्थानकांचा इतिहास मोठा रंजक आहे. या स्थानकांची गरज का संपली? त्या स्थानकांची नावे काय होती? ती कुठे होती? त्यांचा नेमका काय इतिहास आहे हे पाहूया ? ब्रिटीशांच्या काळात मुंबई (बोरीबंदर) ते ठाणे अशी आशियातील पहिली ट्रेन 16 एप्रिल 1853 साली धावली होती. त्या काळात कापडाचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालायचा. त्यामुळे ब्रिटीशांना मुंबई बंदरात कापसाची वाहतूक करण्यासाठी रेल्वे मार्ग बांधायला सुरुवात केली. मुंबई (बोरीबंदर) ते ठाणे मार्गावर शनिवार 16 एप्रिल 1853 साली पहिली रेल्वे धावली. GIPR म्हणजेच ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे...