AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदा महाराष्ट्राकडे संपूर्ण देशाचं लक्ष, मोदींना मागे टाकत पाहा कुणी घेतल्या सर्वाधिक सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १० वर्षात दोन लोकसभा निवडणुकीसाठी सर्वाधिक सभा घेतल्या होत्या. मोदींनी संपूर्ण देश पिंजून काढला होता. यंदा मात्र मोदींपेक्षा एका दुसऱ्या नेत्याने सर्वाधिक सभा घेतल्या आहेत. कोण आहे तो नेता जाणून घ्या.

यंदा महाराष्ट्राकडे संपूर्ण देशाचं लक्ष, मोदींना मागे टाकत पाहा कुणी घेतल्या सर्वाधिक सभा
shailesh musale
shailesh musale | Updated on: May 30, 2024 | 9:37 PM
Share

येत्या ४ जूनला देशाच्या सत्तेवर कोण विराजमान होणार. याचा फैसला होणार आहे. आज सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार थांबला आहे. १ जून शेवटच्या टप्प्यातल्या मतदानानंतर साऱ्या देशाला ४ जूनच्या निकालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान प्रचारात कोण आघाडीवर राहिलं. उपलब्ध माहितीनुसार कुणी किती सभा घेतल्या पाहूयात.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबला आहे. 1 जून ला अवघ्या ५७ लोकसभा जागांसाठी मतदान होईल आणि ४ जूनला देशाच्या सत्तेचं चित्र स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रात कुणी किती सभा घेतल्या याची आकडेवारी पाहिली तर माहितीनुसार, राज्यात नरेंद्र मोदींनी 18 हून जास्त सभा घेतल्या. अमित शाहांनी 11, राहुल गांधींनी 3, प्रियंका गांधींनी 2 तर अरविंद केजरीवालांनी 2 सभा घेतल्या.

देवेंद्र फडणवीसांनी रोड शो मिळून 100 हून अधिक ठिकाणी सभा घेतल्या. शरद पवारांच्या 60 हून अधिक सभा तर अजित पवारांनी 20 हून अधिक ठिकाणी सभा केल्या.

काँग्रेसच्या नाना पटोलेंच्या 50 हून अधिक सभा झाल्या. एकनाथ शिंदेंनी रोड शो मिळून 40 हून जास्त ठिकाणी सभा घेतल्या. उद्धव ठाकरेंनी 30 हून अधिक तर राज ठाकरेंनी महायुतीसाठी 4 सभा केल्या.

अब की बार, 400 पार….आणि मोदी की गँरटी हा भाजपच्या प्रचाराचा नारा होता. तर हाथ बदलेगा हालात….या टॅगलाईननं काँग्रेसनं प्रचार केला.

अमित शाहांचा दावा आहे की पाचव्या टप्प्यातच भाजपनं ३०० हून जास्त जागांचं बहुमत मिळवलं आहे. तर इंडिया आघाडीचा दावा आहे की ४ जूननंतरच्या ४८ तासांआधीच इंडिया आघाडीच्या पंतप्रधानाचं नावं जाहीर होईल.

नेत्यांपैकी देशात सर्वाधिक सभा कुणी घेतल्या यात बिहारचे तेजस्वी यादव सर्वाधिक आघाडीवर राहिले. संपूर्ण देशात तेजस्वी यादवांनी 250 हून जास्त सभा घेतल्या. नरेंद्र मोदींनी 172, प्रियंका गांधींनी 140, अमित शाहांनी 115, राहुल गांधींनी 107, मल्लिकार्जुन खरगेंनी 100 हून अधिक, जे.पी.नड्डा 87, अखिलेश यादवांनी 73 आणि ममता बॅनर्जींनी 69 सभा केल्या.

एरव्ही लोकसभा निवडणुकांवेळी उत्तर प्रदेशचा कौल कुणाच्या बाजूनं असणार याची देशात सर्वाधिक उत्सुकता असते. मात्र यंदा उत्तर प्रदेशबरोबरच महाराष्ट्रात काय होणार. याकडेही देशाचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत