EXPLAINER : भारत लवकरच म्हाताऱ्यांचा देश होणार ? जन्मदर घटू लागल्याने वाढली चिंता…
इतिहासात प्रथमच भारताचा प्रजनन दर रिप्सेसमेंट लेव्हलच्या खाली आला आहे. अशात प्रश्न हा आहे की जास्त लोकसंख्या असून भारतातील घटत्या जन्मदराची चिंता का केली जात आहे.

Declining Birth Rate India : तरुणांचा म्हटला जाणारा भारत लवकरच म्हाताऱ्यांचा देश होणार का ? अशी चर्चा सुरु झाली आहे. जगात ८१९ कोटीहून जास्त लोक रहातात. यातील १४५ कोटी लोक भारतात रहातात. म्हणजे जगात दर सहावा नागरिक भारतीय आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनच्या पुढे गेला आहे. मात्र, तरीही अमेरिकेत बसलेल्या जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी भारतातील घटत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली आहे. मस्क यांनी एक पोस्ट करीत लिहिले आहे की भारतात इतिहासात पहिल्यांदा जन्मदर रिप्लेसमेंट लेव्हलच्या खाली आला आहे. वास्तविक जन्मदर घटण्याचा पहिला इफेक्ट मुले कमी आणि म्हातारे लोक जास्त होण्यावर होणार आहे. याचा दुसरा परिणाम देशाच्या लोकसंख्येत घट होईल, त्यामुळेच भारताविषयी इलॉन मस्क यांनी चिंता व्यक्त केली आहे. सामान्य ‘रिप्लेसमेंट लेव्हल’ काय आहे ? एखाद्या देशात एक महिला आपल्या जीवनात सरासरी किती मुलांना जन्म देते त्यास देशाच्या एकूण लोकसंख्येचा प्रजनन दर म्हटला जातो. सरासरी एक महिला २.१ मुलांना...