AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने हल्ला का केला? राहुल गांधींचा सवाल

नीट पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढला होता, या मोर्चात विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने हल्ला झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरून आता राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे.

विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने हल्ला का केला? राहुल गांधींचा सवाल
rahul gandhiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 24, 2026 | 3:44 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने नीट पेपर फुटी प्रकरणात संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले होते, दरम्यान या आंदोलनात विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने हल्ला झाल्याचा आरोप करण्यात येत होता. आज या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत या आंदोलनात सहभागी झालेला एक तरुण देखील होता, या तरुणावर पॅलेट गनने हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला आहे, यावरून आता राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने हला का करण्यात आला? असा सवाल केंद्र सरकारला केला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर पुन्हा एकदा नीट पेपरफुटी प्रकरणावरून निशाणा साधला आहे. धर्मेंद्र प्रधान गुन्हेगार शिक्षणमंत्री आहेत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी देखील यावेळी राहुल गांधी यांनी केली आहे. नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढला होता, यावेळी विद्यार्थी आणि पोलीस आमने-सामने आले, पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, यावरून देखील राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधींचं आंदोलन 

दरम्यान कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जोरदार आंदोलन केलं होतं. तब्बल तीन तास राहुल गांधी यांनी पंंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं, त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तीन तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली. यानंतर आता काँग्रेसने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणावरून सातत्याने काँग्रेकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत, तसेच अनेक ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आलं आहे.

Follow Us
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
Phaltan Car Accident | साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट
Varun Dhavan On Students Protest | विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! अभिनेता वरुण धवनची पोस्ट व्हायरल
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
26 दिवसांचं उपोषण संपलं! सोनम वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
Sanjay Raut | सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पण... ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा