Independence Day 2022 | भारताला मध्यरात्रीच का मिळाले स्वातंत्र्य? राष्ट्रध्वजाचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व माहिती आहे का?

| Updated on: Aug 15, 2022 | 5:05 AM

Independence Day 2022 | भारताला मध्यरात्रीच स्वातंत्र्य का मिळाले असेल? त्यामागील कारणं काय आहेत? ज्योतिषशास्त्राशी त्याचा काही संबंध आहे का? चला तर समजून घेऊयात

Independence Day 2022 | भारताला मध्यरात्रीच का मिळाले स्वातंत्र्य? राष्ट्रध्वजाचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व माहिती आहे का?
भारताला मध्यरात्री स्वातंत्र्य का मिळाले
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Independence Day 2022 | भारताला मध्यरात्रीच स्वातंत्र्य (Independence Day) का मिळाले असेल? कधी आपण विचार केला आहे का, पाकिस्तान आणि भारत या दोन राष्ट्राचा जन्म एकाच वेळी करण्यात आला. पण पाकिस्तान (Pakistan) एक दिवस अगोदर त्याचा स्वातंत्र्यदिन साजरा करतो. तर भारताने (Bharat, India) त्याचे भविष्य हे रात्री निवडले. रात्रीच्या अंधारातूनच देशाने प्रकाशवाट आरंभली. आज देशाने सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. पण नेमकं रात्री स्वातंत्र घेण्यामागचं कारण काय होतं. काय यामागे काही ज्योतिषाचा ठोकताळा होता? भारतीय राष्ट्रध्वजामागील (National Flag) प्रेरणा ही ज्योतिषशास्त्रातूनच आली आहे का? असे अनेक प्रश्न या स्वातंत्र्यदिनानिमत्त तुम्हाला पडले असतील. या सर्व गोष्टींचा ज्योतिषशास्त्राशी काही संबंध आहे का? चला तर समजून घेऊयात.

 

भारताला शुभ मुहूर्तावर स्वातंत्र्य मिळाले

लाईव्हहिंदुस्थान या संकेतस्थळाने या विषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, भारताच्या स्वातंत्र्याचा काळ ज्योतिषशास्त्राने खूप प्रभावित होता. उज्जैनचे हरदेवजी आणि सूर्यनारायण व्यास यांनी बाबू राजेंद्र प्रसाद यांना भेटले. ते भारताचे पहिले राष्ट्रपती बनणार होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय इंग्रज अधिकाऱ्यांनी दिला होता. पण ज्योतिषशास्त्रानुसार हा अशुभ दिवस येत होता. या दिवसाची सुरुवात रात्री होते आणि त्यातील मध्यरात्रच स्वातंत्र्यासाठी निवडावी असे हरदेव यांनी जोर देऊन सांगितले. 15 ऑगस्ट 1947 रोजी रात्री 12:01 वाजता भारताच्या स्वातंत्र्य दिनाची तारीख आणि वेळ ठरवली गेली. ज्योतिषशास्त्रीय घटक विचारात घेतले गेले. यावेळी चंद्र अत्यंत अनुकूल पुष्य नक्षत्रात होता. पुष्य हा सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो. मध्यरात्री, अभिजीत मुहूर्त, जो कोणताही मोठा प्रयत्न सुरू करण्यासाठी एक उत्कृष्ट क्षण होता, त्यावेळी प्रभावी होता. त्या वेळी, वृषभ राशीचे लग्न चिन्ह होते, ते राष्ट्रासाठी मजबूत पाया दर्शवत होते.

हे सुद्धा वाचा

बहुतेक भारतीय पंतप्रधान जल राशीचे होते.

भारताने आतापर्यंत एकूण 15 पंतप्रधान पाहिले आहेत (त्यांची पुनर्निवड विचारात न घेता), त्यापैकी बहुतेक जल राशीशी संबंधित आहेत ज्यात मजबूत जल घटक आहेत. यापैकी चार पंतप्रधान – गुलझारी लाल नंदा, व्हीपी सिंह, चंद्रशेखर आणि पीव्ही नरसिंह राव – कर्क राशीचे होते. तर जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी हे वृश्चिक आणि मोरारजी देसाई मीन राशीचे होते.

ज्योतिष आणि भारताचा राष्ट्रीय ध्वज

भारताच्या राष्ट्रध्वजाच्या शीर्षस्थानी भगवा रंग आहे. हा मंगळाचा रंग आहे आणि त्यात अग्नीचे तत्व प्रबळ आहे. केशर आणि मंगळ, तसेच अग्नीचे घटक, शक्ती, धैर्य आणि वैभव दर्शवतात. केशर आणि पिवळ्या रंगाचे टोन देखील अगदी सारखेच आहेत. म्हणून ते बृहस्पतिचे विलक्षण आध्यात्मिकता, बुद्धिमत्ता, करुणा आणि औदार्य दर्शवते. बुधाचा आवडता रंग हिरवा आहे. हा रंग विचार आणि बुद्धिमत्तेचे प्रतिक मानले जाते. पांढरा रंग चंद्रदर्शी आहे. चंद्र आहे ही बुद्धिमत्ता आणि भावनांचा प्रभारी आहे.