AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Vs Canada Issue | ‘या’ चार देशांच्या नादाला लागून कॅनडाने घेतला भारताशी पंगा

India Vs Canada Issue | 'या' चार देशांनी भारताबद्दल कॅनडाला असं काय सांगितलं?. हे FIVE EYES कोण आहेत? भारत-कॅनडा वादाशी त्यांचं काय कनेक्शन आहे? कुठल्या आधारावर कॅनडाने इतका मोठा आरोप केला?.

India Vs Canada Issue | 'या' चार देशांच्या नादाला लागून कॅनडाने घेतला भारताशी पंगा
justin trudeau
| Updated on: Sep 22, 2023 | 8:26 AM
Share

नवी दिल्ली : सध्या कॅनडा आणि भारतामधील तणाव टिपेला पोहोचला आहे. दोन्ही देशांकडून दररोज परस्पराविरोधात वेगवेगळ्या Action घेतल्या जात आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरुन या सर्व वादाला सुरुवात झाली. G20 परिषदेसाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी हरदीप सिंह निज्जरचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येसाठी भारताला जबाबदार धरलं. भारत सरकारचे एजंट या हत्येमागे असल्याचा आरोप त्यांनी केला. खलिस्तानी समर्थक हरदीप सिंह निज्जर भारताच्या रडारवर होता. भारताच्या मोस्ट वाँटेडच्या यादीत तो होता. कॅनडाच्या सरेमध्ये अज्ज्ञातांनी गोळी झाडून त्याची हत्या केली. कॅनडा या हत्येसाठी भारताला जबाबदार ठरवत आहे. भारताने कॅनडाचे सर्व आरोप फेटाळून लावताना आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्या दोन्ही देशातील तणाव खूपच वाढला आहे.

आगमी काळात याचे व्यापारी आणि अन्य मैत्रीपूर्ण संबंधांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. जस्टिन ट्रूडो यांनी भारतासोबत काम करत राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारताच महत्त्व वाढतय. आपल्याला त्यांच्यासोबत काम केलं पाहिजे अशी ट्रूडो यांची भूमिका आहे. “मला चिथावणी देऊन समस्या निर्माण करायची नाहीय. पण कॅनडामध्ये कायद्याच राज्य आहे. कॅनेडियन नागरिकांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे” असं जस्टिन ट्रूडो म्हणाले. या वादामुळे भारताने एक मोठं पाऊल उचललं आहे. भारताने व्हिसा बंदी केली आहे. त्यामुळे कॅनेडीयन नागरिक भारतात येऊ शकणार नाहीत. कॅनडाने भारतीय डिप्लोमॅट्सवर कारवाई केली. त्यानंतर भारताने सुद्धा कॅनडाच्या डिप्लोमॅटला देश सोडण्याचा आदेश दिला.

कोणी भरले कॅनडाचे कान?

हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरुन कॅनडाने जे आरोप केले, त्यामागे FIVE EYES आहेत. भारतीय डिप्लोमॅट्सवर पाळत ठेवण्यात आली. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने यामध्ये कॅनडाला मदत केली. त्या आधारावर कॅनडाने हे आरोप केले आहेत. एका अधिकाऱ्याने अनौपचारिक चर्चेमध्ये ही माहिती दिली. या चार देशांनी मिळून एक इंटेलिजेंस इनपुट दिला. कॅनडासह या चार देशांचा समूह FIVE EYES म्हणून ओळखला जातो. या FIVE EYES च इंटेलिजेंस इनपुट या सर्व वादाच्या मूळाशी आहे.

Follow Us
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेर थेट...
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा इशारा; तुमच्या नसानसात...
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बडा नेता हे काय बोलून गेला? थेट मुख्यमंत्री...
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट रेल्वे रुळावरच... पहा व्हिडीओ
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!