महिलांनी घरातच राहावे, नाहीतर अनर्थ ओढावेल; इस्लामिक विद्वानाचे वक्तव्य चर्चेत, बुरखा आवश्यक असल्याची मागणी

सुन्नी मुस्लिम संघटना समस्ता केरळ जाम-इय्यतुल उलमा (कांथापुरम गट) च्या वरिष्ठ नेत्यांनी अलीकडेच केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी बुरखा आवश्यक असल्याचे देखील म्हटले आहे.

महिलांनी घरातच राहावे, नाहीतर अनर्थ ओढावेल; इस्लामिक विद्वानाचे वक्तव्य चर्चेत, बुरखा आवश्यक असल्याची मागणी
Kanthapuram
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 31, 2026 | 9:39 AM

इस्लामी विद्वानांच्या एका संघटनेने धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजकांना इस्लामी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि ज्या पुरुषांशी तरुणींचे कौटुंबिक संबंध नाहीत, त्यांच्यासोबत त्यांना सार्वजनिक रस्त्यांवर आणि व्यासपीठांवर आणणे टाळण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या अपीलवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तसचे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

कठोर सूचना दिल्या

नेत्यांनी स्पष्ट केले की, सर्व धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव केवळ धार्मिक मर्यादा व नियमांच्या चौकटीत राहूनच आयोजित केले जावेत. त्यांनी विविध संस्था आणि मदरशांच्या व्यवस्थापकांना कठोर सूचना दिल्या आहेत. या सुचनांमध्ये कोणताही सार्वजनिक उत्सव धार्मिक मर्यादांचे उल्लंघन करणार नाही, हे सुनिश्चित करणे ही त्यांची जबाबदारी आहे असे म्हटले आहे. हे विधान समोर आल्यानंतर केरळच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात महिला स्वातंत्र्य आणि रूढीवादी विचारसरणीबाबत तीव्र चर्चा सुरू झाली आहे.

‘समस्त केरळ जमीयतुल उलेमा’च्या कंथापुरम गटाने केली अपील

राज्यातील सुन्नी-शाफई इस्लामी विद्वानांची प्रमुख परिषद ‘समस्त केरळ जमीयतुल उलेमा’च्या कंथापुरम गटाने ही अपिल केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, धार्मिक उत्सव आणि कार्यक्रमांमध्ये निर्धारित मर्यादा पाळल्या जाव्यात. अलीकडेच जारी केलेल्या एका निवेदनात समस्त केरळ जमीयतुल उलेमाचे अध्यक्ष ई. सुलेमान मुसलियार आणि महासचिव कंथापुरम ए. पी. अबूबकर मुसलियार यांनी लोकांना आवाहन केले की, धार्मिक मर्यादांचे उल्लंघन करून आयोजित होत असलेल्या इस्लामी उत्सव आणि समारंभांच्या कोणत्याही घटनेला गांभीर्याने घ्यावे.

रविवारी कोच्चीमध्ये एका इस्लामिक कॉन्फरन्समध्ये बोलताना कंथापुरम म्हणाले की, महिलांना सार्वजनिक व्यासपीठांवर आणल्याने “मोठा विनाश” होईल आणि दावा केला की, इस्लामने हे रोखण्यासाठी महिलांसाठी पर्दा अनिवार्य केला आहे. ते म्हणाले, “महिलांना अशा प्रकारे सार्वजनिक व्यासपीठांवर आणल्याने मोठा अनर्थ होतो, हे जाणून इस्लामने महिलांसाठी पर्दा अनिवार्य केला आहे. पवित्र कुरानमध्ये म्हटले आहे की, महिलांनी आपल्या घरातच राहावे आणि सार्वजनिकरीत्या समोर येऊ नये.”

कांथापुरम म्हणाले की, ज्ञानी धार्मिक विद्वानांनी, विशेषतः समस्त नेत्यांनी, गेल्या १०० वर्षांपासून अशा गोष्टी शिकवल्या आहेत. ते म्हणाले, “म्हणून, तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की सर्व ज्ञानी लोकांनी, विशेषतः समस्त नेत्यांनी, १०० वर्षांपासून हे शिकवले आहे आणि म्हणूनच या देशातील महिलांनी आपला मान आणि प्रतिष्ठा जपली आहे.”

नेत्यांनी विशेषतः सांगितले की, तरुण महिलांना सार्वजनिक रस्त्यांवर आणि व्यासपीठांवर अनोळखी पुरुषांसोबत एकत्र आणणे, आणि अशा कार्यक्रमांमध्ये इस्लामविरोधी चालीरीती व उत्सवांचा समावेश करणे, हे श्रद्धावानांसाठी अयोग्य असून ते निषिद्ध आहे. त्यांनी महल्लू (स्थानिक मशीद-समुदाय) अधिकारी आणि मशिदी, मदरसे व इतर संस्था आणि संघटनांच्या नेत्यांना सतर्क राहून असे कार्यक्रम इस्लामी नियमांनुसार आयोजित केले जातील याची खात्री करण्याचे आवाहनही केले.

Follow Us