AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर कधी आणि कुठे होणार त्यांचा शपथविधी? काय असेल खास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे प्रसंग खास बनवले आहेत. मग ते शपथविधी सोहळा असेल तरी देखील. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर पुन्हा सत्तेत आले तर त्यांच्या शपथविधीसाठी पक्षाने खास तयारी केली आहे.

नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर कधी आणि कुठे होणार त्यांचा शपथविधी? काय असेल खास
| Updated on: May 30, 2024 | 8:26 PM
Share

लोकसभा निवडणुकीचा शेवटचा आणि सातवा टप्प्याचे मतदान १ जून रोजी पार पडणार आहे. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. मोदींनी यंदा एनडीएला अब की बार ४०० पार असा नारा दिला होता. जर पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आले तर त्यांच्या शपथविधी आणखी खास करण्यासाठी पक्षाने योजना आखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे याआधीचे २ शपथविधी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पार पडले आहेत. पण जर एनडीए सत्तेत आली तर मात्र यंदा दुसऱ्या ठिकाणी शपथविधी कार्यक्रम ठेवण्याचा भाजपचा विचार आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात जर एनडीएचं सरकार सत्तेत आलं तर शपथविधी कोठे होणार, असा प्रश्न आतापासून अनेकांना पडला आहे. हिंदुस्तान टाईममध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जर मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर ९ जून रोजी शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे. सूत्रांचा हवाल्यानुसार संभाव्य शपथविधी सोहळ्यासाठी एक तात्पुरती योजना आधीच तयार केली गेली असल्याची माहिती आहे.

शपथविधी कोठे होणार?

2014 मध्ये एनडीए सरकारचा 26 मे (सोमवार) रोजी शपथविधी पार पडला होता.  त्या वर्षी 16 मे रोजी निकाल जाहीर झाला होता. 2019 मध्ये एनडीए सरकारचा 30 मे (गुरुवार) रोजी शपथविधी झाला होता. त्या वर्षी 23 मे रोजी निकाल जाहीर झाला होता. हे दोन्ही शपथविधी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झाले होते.

पण आता वृत्त असे आहे की, यावेळी भाजपकडून काही वेगळा विचार सुरु आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथविधी सोहळा न घेण्याच्या ते विचारात आहे. यावेळी पक्ष बाहेर जागा शोधत आहे. जेणेकरुन जास्तीत जास्त लोकांना या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावता येईल. यासाठी कर्तव्यपथचा देखील विचार केला जात असल्याची चर्चा आहे.

कोणती असेल पर्यायी जागा

‘कर्तव्य पथ’ किंवा मग पर्यायी व्यवस्था देखील केली जाऊ शकते. निवडणुकीच्या निकालानंतरच जागा ठरवली जाईल असं देखील दुसऱ्या सूत्रांची माहिती आहे.

या सगळ्या परिस्थितीत हवामानाची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे. पाऊस असेल तर बाहेर शपथविधी होणे कठीण आहे. दुसरीकडे दिल्लीत तापमान प्रचंड वाढले आहे. यंदा तापमानाने रेकॉर्ड मोडले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य तिसऱ्या शपथविधी सोहळ्याची चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) कार्यकारिणी बैठकीत सांगितले की, पक्ष 10 जून रोजी आपला स्थापना दिवस साजरा करू शकणार नाही. शपथविधी सोहळ्यात ते व्यस्त असतील.

Follow Us
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय.
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर...
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर....
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?.
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव.
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?.
खरातच्या पेन ड्राईव्हमध्ये 3 मंत्री, म्हणून अशोक खरातचा एन्काऊंटर?
खरातच्या पेन ड्राईव्हमध्ये 3 मंत्री, म्हणून अशोक खरातचा एन्काऊंटर?.
दादांच्या घातपाताचा कट? मुडदाही खोदून काढू; मुख्यमंत्र्यांनी घेतला....
दादांच्या घातपाताचा कट? मुडदाही खोदून काढू; मुख्यमंत्र्यांनी घेतला.....
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.