Republic Day : ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरु नका!, शेतकऱ्यांच्या परेडपूर्वी उत्तर प्रदेश सरकारचा आदेश

| Updated on: Jan 24, 2021 | 6:45 PM

उत्तर प्रदेश सरकारनं सर्व जिल्ह्यातील पुरवठा अधिकाऱ्यांना आंदोलक शेतकऱ्यांना डीझेल देऊ नका, असा आदेश दिला आहे.

Republic Day : ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरु नका!, शेतकऱ्यांच्या परेडपूर्वी उत्तर प्रदेश सरकारचा आदेश
Follow us on

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 2 महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर परेड काढण्याची परवानगी दिल्ली पोलिसांनी दिली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारकडून शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडला आडकाठी आणण्याचा प्रयत्न होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण उत्तर प्रदेश सरकारनं सर्व जिल्ह्यातील पुरवठा अधिकाऱ्यांना आंदोलक शेतकऱ्यांना डिझेल देऊ नका, असा आदेश दिला आहे. त्यामुळे डिझेलविना ट्रॅक्टर रॅली कशी निघणार असा प्रश्न आता विचारला जात आहे.(Uttar Pradesh govt orders not to fill diesel in tractors on the backdrop of farmers’ parade)

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये सहभागी होण्याचा विचार करणाऱ्या उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा हा निर्णय अडचणीचा ठरणार आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयावर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर टिकैत यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की, सरकार तुम्हाला डिझेल देत नसेल तर तुम्ही आहात त्या ठिकाणीच रस्ते बंद करा. मुरादाबादच्या पूर्व भागातील गाजीपूरपर्यंतच्या शेतकऱ्यांनी आपल्याला ही माहिती दिल्याचं टिकैत यांनी सांगितलं.

प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडच्या मार्गाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांनी 5 मार्गांना परवानगी दिली आहे. पोलिसांसोबत झालेल्या बैठकीनंतर योगेंद्र यादव यांनी सांगितलं की दिल्ली पोलिसांनी अधिकृतरित्या 26 जानेवारीला ट्रॅक्टर परेडला मंजुरी दिली आहे. जे शेतकरी आपले ट्रॅक्टर आणि ट्रॉलीसह दिल्लीच्या सीमेवर आले आहेत. त्यांनी ट्रॉली जागेवरच सोडून फक्त ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत यावं. शेतकरी शांतपणे ट्रॅक्टर परेड काढतील, असं योगेंद्र यादव यांनी सांगितलं.

‘काही अदृश्य शक्तीमुळेच तोडगा नाही’

26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे धाबे दणाणले आहेत. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी तर कोणती तर काही अदृश्य शक्तीमुळेच शेतकरी आंदोलनावर तोडगा निघत नसल्याचा दावा केला. मात्र, ही अदृश्य शक्ती कोणती? हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. शेतकरी आंदोलनाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्रसिंह तोमर यांनी मीडियाशी संवाद साधून हा आरोप केला. कोणती तरी अदृश्य शक्ती आहे. त्यांनाच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघू नये असं वाटतं. नाही तर आमच्याशी चर्चा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांनी वेगळाच राग अळवला नसता, असा दावा तोमर यांनी केला.

संबंधित बातम्या :

काही अदृश्य शक्तीमुळेच शेतकरी आंदोलनावर तोडगा नाही; केंद्रीय कृषी मंत्र्यांचा दावा

सरकारनं चीनच्या सैनिकांना सीमेवर रोखण्याऐवजी शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवर अडवलं: राहुल गांधी

Uttar Pradesh govt orders not to fill diesel in tractors on the backdrop of farmers’ parade