
सापांबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. सापांबद्दल असलेल्या गैरसमजांमुळे आपण अनेकदा दिसला साप की लगेच त्याला मारतो. पण या ठिकाणी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की, भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आहेत, मात्र त्यातील केवळ काही जातीच या विषारी आहेत. भारतामध्ये जे साप आढळतात त्यांचं वर्गीकरण सामान्यत: विषारी, निमविषारी आणि बिनविषारी प्रजाती असं केलं जातं. यामध्ये बिनविषारी सापांच्या प्रजातीच अधिक आहेत. विषारी सापांच्या प्रजाती या खूप थोड्या आहेत. तीच अवस्था निमविषारी सापांची देखील आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास राज्यात प्रमुख्यानं चार प्रमुख विषारी सापांच्या जाती आढळून येतात. ज्यामध्ये मण्यार, फुरसे, नाग आणि घोणस या सापांचा समावेश होतो. यातील नाग प्रजातीचा साप हा ओळखण्यासाठी खूप सोपा असतो, कारण तो त्याला जेव्हा धोका जाणवतो तेव्हा फडी काढतो, त्यामुळे तो सहज ओळखता येतो. मात्र साप कोणताही असो त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका, किंवा मारू नका, त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, सर्पमित्र त्या सापाला त्याच्या सुरक्षित अधिवासात सोडतील.
मात्र तुम्हाला सापांबद्दल एक गोष्ट माहिती आहे का? की काही सापांच्या प्रजाती अशा आहेत, त्या मेल्यानंतरही माणसाला चावू शकतात. यावर तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र हे खरं आहे. बीबीसीने दिलेल्या एका रिपोर्टनुसार आसाम राज्यात अशा काही घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये सापाने मृत्यूनंतर देखील माणसाला चावा घेतला आहे, सापाने चावा घेतल्यानंतर सर्पदंश झालेली व्यक्ती तब्बल 6 दिवस रुग्णालयात होती, योग्यवेळी उपचार मिळाल्यामुळे जीव वाचला. जे साप मेल्यानतंरही माणसाला चावू शकतात, त्यामध्ये नाग, घोणस आणि ब्राऊन स्नेक्स या तीन जातींच्या सापांचा प्रामुख्याने समावेश होतो. यातील दोन जाती नाग आणि घोणस हे भारतात आढळून येतात. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात आढळतात. तर ब्राऊन स्नेक्स ही सापाची प्रजात ऑस्ट्रेलियामध्ये आढळते.
साप मेल्यानंतरही कसा चावतो
तज्ज्ञांच्या मते सापांचं विष हे माणसाच्या लाळे सारखं असतं, जे विषारी साप असतात, त्यांच्या विष ग्रंथिमध्ये ते विष साचलेलं असतं. आणि तुम्ही जेव्हा सापाला मारता तेव्हा काहीही साप हे असे असतात की त्यांची नर्वस सिस्टीम लगेच बंद होत नाही. साप मेल्यानंतर त्याच्या शरीरातील एक एक अवयव हळुहळु निकामी होतो, मात्र त्यादरम्यान तुम्ही त्याला स्पर्श केला तर तो तुम्हाला चावण्याची शक्यता असते, अशी माहिती बिबीसीच्या एका रिपोर्टमध्ये देण्यात आलेली आहे.