AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कारमधील एअरबॅग संदर्भात नितीन गडकरी यांची घोषणा, पाहा काय म्हणाले ?

नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की देशातील ऑटो सेक्टर वेगाने वाढत आहे. भारताने अलीकडेच या बाबतीत जपानलाही मागे टाकले आहे. आता भारत जगातील तिसरा सगळ्यात मोठा ऑटो बाजार बनला आहे.

कारमधील एअरबॅग संदर्भात नितीन गडकरी यांची घोषणा, पाहा काय म्हणाले ?
NITIN GADKARI
| Updated on: Sep 13, 2023 | 8:14 PM
Share

नवी दिल्ली | 13 सप्टेंबर 2023 : वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी कारमधील एअरबॅग वाढविण्यासंदर्भात बऱ्याच काळापासून चर्चा सुरु आहे. आधीच्या बातम्यानूसार ऑक्टोबर महिन्यांपासून देशात विक्री होणाऱ्या सर्व कारना 6 एअरबॅग ( Airbags ) बंधनकारक करण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. परंतू रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भात एका कार्यक्रमात वेगळीच माहिती दिली आहे. देशात या वर्षाच्या सुरुवातीला नवीन क्रॅश टेस्ट नियमांना लागू करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने आता वेगळा निर्णय घेतला आहे.

रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. तसेच यात मृत्यूची संख्या देखील जास्त आहे. त्यामुळे कारमध्ये सहा एअर बॅग अनिर्वाय करण्यासंदर्भात चर्चेला तोंड फुटले होते. ऑटोमोटिव्ह कंपोनेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ( ACMC ) च्या वार्षिक बैठकी दरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कारसाठी 6 एअरबॅगचा नियम बंधनकारक असणार नाही. देशात अनेक कार कंपन्या यापूर्वीच सहा एअरबॅगची सुविधा देत आहेत. या कार कंपन्या त्याची जाहीरात देखील करीत आहेत. अशाच कारमध्ये सहा एअरबॅग बंधनकारक करण्याच्या नियमाची आवश्यकता नसल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

सहा एअरबॅग बंधनकारक नाहीत !

नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की देशातील ऑटो सेक्टर वेगाने वाढत आहे. भारताने अलीकडेच या बाबतीत जपानलाही मागे टाकले आहे. आता भारत जगातील तिसरा सगळ्यात मोठा ऑटो बाजार बनला आहे. अशा कार कंपन्यात नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. वाहन मालक देखील कार विकत घेताना नवीन टेक्नॉलॉजी आणि फिचर्स पाहून आपली निवड करीत आहेत. अशात काही कार कंपन्या ग्राहकांना आधीपासूनच सहा एअरबॅगची सुविधा देत आहेत. अशात ज्यांना स्पर्धेत टीकायचे आहे ते आपोआपच सहा एअरबॅग देतील. त्यामुळे आम्हाला सहा एअरबॅग अनिर्वाय करण्याचा निर्णय घेण्याची काही गरज नसल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे.

गेल्यावर्षी गडकरी काय म्हणाले

गेल्यावर्षी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑक्टोबर 2023 पासून देशात सहा एअरबॅग बंधनकारक करण्याचा नियम लागू करण्याची घोषणा केली होती. देशात सर्वात जास्त छोट्या कारची खरेदी मध्यमवर्गीयांकडून केली जाते तसेच लो बजेट गाड्यांची मागणी जादा आहे. त्यावेळी त्यांनी वाहन निर्माण कंपन्या केवळ जादा किंमतीच्या प्रिमियम कारमध्येच सहा अथवा आठ एअरबॅगची सुविधा देत आहेत अशी टीका गडकरी यांनी केली होती.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.