भारतीयांनी बनवलेल्या कंपन्यांनी जगाचे नेतृत्व का करु नये?, नरेंद्र मोदी यांचे SRCC च्या शताब्दी सोहळ्यात आवाहन
पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शनिवार नवी दिल्लीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स (SRCC) च्या शताब्दी समारंभात संबोधित करताना तरुण पिढीला आवाहन केले.

आज भारतीय जगाच्या टॉप कंपन्याचे नेतृत्व करीत आहे. याचा आपल्याला अभिमान वाटत आहे, मग भारताची ग्लोबल कन्सलटन्सी फर्म का नाही बनू शकत? आमची अकाऊंटिंग फर्म, लीगल फर्म, फायनान्स फर्म ग्लोबल लीडर का बनू शकत नाही ? त्यामुळे भारतीयांनी बनवलेल्या कंपन्यांनी जगाचे नेतृत्व का करु नये. हे सर्व शक्य आहे. यासाठी तुमच्याकडे नेटवर्कही आहे आणि नॉलेजही आहे. देशात आता नव्या स्वप्नांना पूर्ण करण्याची इको सिस्टीम देखील बनली आहे. आता वेळ मोठे लक्ष्य बनवणे आणि त्यांना प्राप्त करण्याचा आहे असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला. नवी दिल्लीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स (SRCC) च्या शताब्दी समारंभात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे व्हीजनच सादर केले.
श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या शताब्दी सोहळ्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, अर्धा ग्लास भरलेला आहे असे अनेक जण म्हणतात. परंतू आधीच्या सरकारात अर्धा ग्लास रिकामा असल्याचे सांगणारी निराशावादी मनोवृत्ती होती. मी तर उलट म्हणतो पूर्ण ग्लास भरलेला आहे. अर्धा पाण्याने तर अर्धा ग्लास हवेने भरलेला आहे असे म्हणणारा आशावादी आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की २००८ रोजी दहशतवादी हल्ला झाला तर त्यावेळच्या सरकारने पाकिस्तानला जाब विचारला नाही. परंतू आमचे सरकार आल्यानंतर पाकचे असे करण्याचे साहस होत नाही. आज दहशतवाद पसरवणारे पूर्णपणे बॅकफूटवर आले आहेत. पाकिस्तानने कोणतेही दु:साहस केले तर भारतीय सशस्त्र दले त्यांना त्यांच्या घरात घुसून मारतात. जम्मू-काश्मीरपासून ते ईशान्य भारतापर्यंत शांततेचे वातावरण निर्माण झाले असून हिंसाचारात मोठी घट झाली आहे, असेही ते म्हणाले. देशांतर्गत सुरक्षेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, माओवादी दहशतवाद आणि नक्षलवादाचे कंबरडे पूर्णपणे मोडण्यात सैन्याला आणि प्रशासनाला यश आले आहे असेही ते म्हणाले.
श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या शताब्दी सोहळ्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, आज दहशतवाद पसरवणारे पूर्णपणे बॅकफूटवर आले आहेत. पाकिस्तानने कोणतेही दु:साहस केले तर भारतीय सशस्त्र दले त्यांना त्यांच्या घरात घुसून मारतात.जम्मू-काश्मीरपासून ते ईशान्य भारतापर्यंत शांततेचे वातावरण निर्माण झाले असून हिंसाचारात मोठी घट झाली आहे, असेही ते म्हणाले.देशांतर्गत सुरक्षेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, माओवादी दहशतवाद आणि नक्षलवादाचे कंबरडे पूर्णपणे मोडण्यात सैन्याला आणि प्रशासनाला यश आले आहे.
एके काळी जो देश ‘धोरणात्मक पंगुत्वामुळे’ चिंतेत होता, तोच भारत आज आपल्या धोरणात्मक गतिशीलतेमुळे जगभरात चर्चेत आहे. भारताची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत झाली असून देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार सर्व आवश्यक पावले उचलत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.